शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

रमेश कदम यांनी राष्ट्रवादी संपविली

By admin | Updated: April 6, 2015 01:31 IST

तानाजी चोरगे : जिल्हा बँक निवडणुकीतील वातावरण तापले, आरोप प्रत्यारोप सुरू

चिपळूण : जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. रमेश कदम हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपल्याच पक्षाच्या बँकेबाबत आरोप करताना आपण या बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे पुढे काय काय झाले ते जनतेला सांगा. ज्यांनी बँकेकडून लाभ घेतला त्यांनी बँकेवर बोलू नये. त्यांनी चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी संपवून आता बँकेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लावताना २० लाख रुपये संचालकांनी घेतले, असा आरोप कदम यांनी केला होता. कदम यांना वर्षभरांनी साक्षात्कार झाला. यापूर्वी अनेकांनी अनेक आरोप केले. पण एकानेही पुरावा दिला नाही. आता वर्षभरानंतर त्यांचा कोण तरी घेतला नाही म्हणून यांना जाग आली आहे. बँकेत १२ ते १५ हजार पगार मिळणारा कर्मचारी २० लाख रुपये कसा फेडणार? याचे व्याज ३ लाख रुपये होते. आयुष्यभर नोकरी करुनही २० लाख फिटणार नाहीत. बँकेची निवडणूक आली म्हणून यांना हे उद्योग सुचले आहेत. इतरांवर आरोप करताना स्वत:चा इतिहास पाहावा. इतकेच काय तर तक्रारदाराला घेऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी दाखल करावी. पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी व बदनामी कशासाठी? कोणी सुपारी तर दिली नाही ना? असा संशय चोरगे यांनी व्यक्त केला आहे. बँक प्रगतीपथावर आहे असे नाबार्ड, सहकार खाते सांगते. लेखी आॅडीट आहे. बँकेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. सीबीएस आहे. एटीएम बसवणे सुरु आहे. एलपीए शून्य आहे. १४०० कोटीपर्यंत ठेवी आहेत. ८५० कोटींचे कर्ज दिले आहे. असे असताना माजी आमदार कदम यांनी नोकरीत घ्या म्हणून जी चार नावे सुचवली ती नापास झाली. त्याला बँक संचालक काय करणार? ऐन निवडणुकीच्या तोंडावर संचालकांना व बँकेला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. बदनामी करण्यापेक्षा सबळ पुरावा घ्या व गुन्हा दाखल करा. आपल्याच पक्षाच्या लोकांवर आरोप करुन पक्ष नाहीसा करण्याचे काम सुरु आहे हे खेदजनक आहे. भैरीसमोर उभे राहून फुल उचलून खोटे बोलणारे भैरीने पाहिले आहेत त्यापेक्षा गुन्हाच दाखल करा. बँकेची प्रगती झाली की नाही हे जनतेला कळेल, असे आव्हान चोरगे यांनी दिले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत माजी आमदार कदम विरूध्द चोरगे असा संघर्ष सुरू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)