शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचा टँकर तीन वर्षे लांजा पंचायत समितीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

राजापूर : सुमारे तीन वर्षांपूर्वी लांजा तालुक्याला दिलेला टँकर अद्यापही राजापूर पंचायत ...

राजापूर : सुमारे तीन वर्षांपूर्वी लांजा तालुक्याला दिलेला टँकर अद्यापही राजापूर पंचायत समितीला परत न मिळाल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना पंचायत समितीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत राजापूर तालुक्यात केवळ एकाच गावाने टँकरची मागणी केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाल्यास पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागणार आहे. राजापूर आणि पाणीटंचाई हे जवळजवळ एक समीकरणच बनले आहे. गेली वर्षानुवर्षे राजापूर तालुका पाणीटंचाईच्या समस्येसोबत झगडत आहे. त्यासाठी दरवर्षी नवनवीन योजना, आराखडे तयार होत आहेत. मात्र तालुका टंचाईमुक्त करण्यात अद्यापही यश आलेले नाही.

पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले उन्हाळ्यात मात्र ठणठणीत कोरडे पडतात. त्यामुळे मार्च महिन्यापासून तालुकावासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून, दीड-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा टंचाईग्रस्त गावांना तालुका पंचायत समितीकडून मग टँकरने पाणीपुरवठा केला जातो. राजापूर पंचायत समितीकडे एक शासकीय मालकीचा टँकर आहे. मात्र दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या पाहता एक टँकर अपुरा पडत असल्याने प्रशासनाला खासगी टँकर अधिग्रहित करावे लागतात. मात्र शासनाकडून खासगी टँकरमालकांना अत्यल्प भाडे मिळत असल्याने व तेही वेळेत मिळत नसल्याने खासगी टँकर मालक प्रशासनाला वाहन देण्यास टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे.

तीन वर्षांपूर्वी राजापूर पंचायत समितीचा शासकीय टँकर लांजा तालुक्यासाठी देण्यात आला होता. तो आजपर्यंत राजापूर पंचायत समितीला प्राप्त न झाल्याने गेली दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले होते. यावर्षी प्रशासनाने ८३ गावांतील २४४ वाड्यांचा समावेश असलेला सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये काही संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत, तर काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एका गावाने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र लांजा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी दिलेला टँकर पंचायत समितीला परत मिळालेला नाही. टँकर परत मिळावा म्हणून पंचायत समितीच्या बैठकीत ठरावही करण्यात आला आहे. मात्र त्याला संबंधितांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीतरी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा होणार का? शासकीय टँकर उपलब्ध न झाल्यास प्रशासन खासगी टँकरचा आधार घेणार का? की, पाण्यासाठी यावर्षीही वणवण भटकावे लागणार? असे प्रश्न निर्माण झाला आहे.