शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची उद्याने स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

उद्यानांचा प्रश्न : नगरपरिषद लक्ष देत नसल्याने नाराजी

राजापूर : राजापूर शहरात असणारी बालोद्याने व पिकनिक स्पॉट विकासाबरोबरच स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असून, गेल्या दोन वर्षांत यावर खर्च झालेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर नगरपरिषदेने गेल्या दोन वर्षांच्या काळात शहरातील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान, कोंढेतड येथील महंमदसाहेब बालोद्यानावर तसेच रानतळे येथील पिकनिक स्पॉटवर लाखो रुपये खर्च केले असले तरी आज या उद्यानांची अवस्था बिकट आहे.शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत देणारी राजापूर नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत स्वत:च मोठ्या प्रमाणावर उदासिन आहे. शहरात असणारी उद्याने व पिकनिक स्पॉट सद्यस्थितीत कचऱ्याची आगारे बनली आहेत. रानतळे येथील पिकनिक स्पॉट तर गेले अनेक महिने साफ न केल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कारंज्यामध्ये पाण्याचा तुटवडा व त्याच्या स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या पिकनिक स्पॉटकडे शहरवासीयांनी पाठ फिरवली आहे.तसेच शहरातील साई मंदिरजवळील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान व कोंढेतड येथील महमदशेठ बालोद्यानावर गेल्या दोन वर्षांत राजापूर नगर परिषदेने सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही उद्याने लहान मुलांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहेत. या दोन्ही उद्यांनावर नगर परिषदेने खरोखरच सुशोभिकरणासाठी खर्च केला का, असा प्रश्न या उद्यानांमध्ये गेल्यावर पडल्यावाचून राहात नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात या उद्यानांवर खर्च झालेले लाखो रुपये नेमके कशावर खर्च झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला असून, नगर परिषदेने जनतेचा पैसा स्वत:च्या फायद्यासाठीच वापरल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.एकीकडे शासनाकडून आलेला निधी खर्ची घालायला पाहिजे म्हणून खर्च करायचा. त्यातून आपले अर्थपूर्ण व्यवहार साधायचे, असा नवा फंडा राजापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहरातील सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली असून, शहरातील उद्याने व पिकनिक स्पॉट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहेत. उद्यानांना नगर परिषदेने स्वच्छतेचा साज चढवून ती खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)