शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर--भर पावसात राजापुरात पाणीटंचाइ

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

हंडामोर्चाचा इशारा : ऐन पावसाळ्यात महिलांवर दाहीदिशा फिरण्याची वेर्ळ

राजापूर : एकीकडे तालुक्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे शहरातील वरचीपेठ तेली वठार भागातील नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी राजापूर नगरपरिषदेवर हंडा मोर्र्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात हा पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेला महिनाभर संपूर्ण वरची पेठ परिसराला नगर परिषदेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे येथील नागरिकांना जेमतेम दोन ते तीन हंडे पाणी मिळते. संपूर्ण परिसरातील कुटुंबांची हीच समस्या असून, येथील नागरिकांनी ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणूनदेखील निर्माण झालेली समस्या अद्याप प्रशासनाला दूर करता आलेली नाही. मागील तीन महिने समाधानकारक पाऊस पडत असूनदेखील वरचीपेठ भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. हंडा मोर्चाव्दारे नगर परिषदेवर धडक देण्याची तयारी सुरु झाली आहे. मध्यंतरीच्या काळात राजापूर नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून शीळ जॅकवेलवर मोबाईल रिमोट सेन्सरप्रणाली सुरु केली असून, या प्रणालीव्दारे शीळ जॅकवेलवरून पाणी खेचणे सोयीचे झाले आहे. या प्रणालीमुळे राजापूर नगरपरिषदेचा कर्मचारीवर्गावर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळे हेच मनुष्यबळ नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वापरु शकणार आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असून, अनेकवेळा सांगूनही हे कर्मचारी योग्य दाबाने पाणी सोडत नसल्याची तक्रार नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीमुळेच शहरातील अनेक नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. याबाबत येथील नागरिकांनी भागातील नगरसेवकांना व नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली आहे. मात्र, या समस्येकडे येथील स्थानिक नगरसेवक व नगर परिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)