शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राजापूर--भर पावसात राजापुरात पाणीटंचाइ

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

हंडामोर्चाचा इशारा : ऐन पावसाळ्यात महिलांवर दाहीदिशा फिरण्याची वेर्ळ

राजापूर : एकीकडे तालुक्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे शहरातील वरचीपेठ तेली वठार भागातील नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी राजापूर नगरपरिषदेवर हंडा मोर्र्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात हा पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेला महिनाभर संपूर्ण वरची पेठ परिसराला नगर परिषदेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे येथील नागरिकांना जेमतेम दोन ते तीन हंडे पाणी मिळते. संपूर्ण परिसरातील कुटुंबांची हीच समस्या असून, येथील नागरिकांनी ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणूनदेखील निर्माण झालेली समस्या अद्याप प्रशासनाला दूर करता आलेली नाही. मागील तीन महिने समाधानकारक पाऊस पडत असूनदेखील वरचीपेठ भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. हंडा मोर्चाव्दारे नगर परिषदेवर धडक देण्याची तयारी सुरु झाली आहे. मध्यंतरीच्या काळात राजापूर नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून शीळ जॅकवेलवर मोबाईल रिमोट सेन्सरप्रणाली सुरु केली असून, या प्रणालीव्दारे शीळ जॅकवेलवरून पाणी खेचणे सोयीचे झाले आहे. या प्रणालीमुळे राजापूर नगरपरिषदेचा कर्मचारीवर्गावर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळे हेच मनुष्यबळ नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वापरु शकणार आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असून, अनेकवेळा सांगूनही हे कर्मचारी योग्य दाबाने पाणी सोडत नसल्याची तक्रार नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीमुळेच शहरातील अनेक नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. याबाबत येथील नागरिकांनी भागातील नगरसेवकांना व नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली आहे. मात्र, या समस्येकडे येथील स्थानिक नगरसेवक व नगर परिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)