शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर--भर पावसात राजापुरात पाणीटंचाइ

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

हंडामोर्चाचा इशारा : ऐन पावसाळ्यात महिलांवर दाहीदिशा फिरण्याची वेर्ळ

राजापूर : एकीकडे तालुक्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे शहरातील वरचीपेठ तेली वठार भागातील नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी राजापूर नगरपरिषदेवर हंडा मोर्र्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात हा पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेला महिनाभर संपूर्ण वरची पेठ परिसराला नगर परिषदेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे येथील नागरिकांना जेमतेम दोन ते तीन हंडे पाणी मिळते. संपूर्ण परिसरातील कुटुंबांची हीच समस्या असून, येथील नागरिकांनी ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणूनदेखील निर्माण झालेली समस्या अद्याप प्रशासनाला दूर करता आलेली नाही. मागील तीन महिने समाधानकारक पाऊस पडत असूनदेखील वरचीपेठ भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. हंडा मोर्चाव्दारे नगर परिषदेवर धडक देण्याची तयारी सुरु झाली आहे. मध्यंतरीच्या काळात राजापूर नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून शीळ जॅकवेलवर मोबाईल रिमोट सेन्सरप्रणाली सुरु केली असून, या प्रणालीव्दारे शीळ जॅकवेलवरून पाणी खेचणे सोयीचे झाले आहे. या प्रणालीमुळे राजापूर नगरपरिषदेचा कर्मचारीवर्गावर होणारा खर्चही वाचणार आहे. त्यामुळे हेच मनुष्यबळ नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वापरु शकणार आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असून, अनेकवेळा सांगूनही हे कर्मचारी योग्य दाबाने पाणी सोडत नसल्याची तक्रार नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीमुळेच शहरातील अनेक नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसून, अतिशय कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. यामुळे शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. याबाबत येथील नागरिकांनी भागातील नगरसेवकांना व नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली आहे. मात्र, या समस्येकडे येथील स्थानिक नगरसेवक व नगर परिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी प्रश्न उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)