शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या माध्यमातून सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने घेतला आहे.

पर्यावरण जागरूकता वाढू लागल्याने त्यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१० साली राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) ही विशेष न्याययंत्रणा स्थापन केली आहे. ‘एनजीटी’च्या अधिकार कक्षेत प्रामुख्याने जलप्रदूषण कायदा-१९७४, वनसंवर्धन कायदा-१९८०, वायुप्रदूषण कायदा-१९८१, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६, सार्वजनिक दायित्व विमा कायदा-१९९१ आणि जैविक विविधता कायदा-२००२ अंतर्गत कोकण व चिपळूणशी संबंधित असलेल्या समस्यांवर दाद मागितली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकणच्या समस्या कायदेशीर पद्धतीने मांडत असल्याबद्दल ॲड. ओवेस पेचकर यांचा ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.च्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी ग्लोबल चिपळूणचे चेअरमन श्रीराम रेडीज, मनोज गांधी, धीरज वाटेकर, विश्वास पाटील, प्रल्हाद लाड, विलास महाडिक आदी उपस्थित होते. या वेळी चेअरमन श्रीराम रेडीज म्हणाले, सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरावामुळे हा जणू चेक डॅम बनला आहे. कोकणात सर्वत्र दरडी कोसळताहेत. महामार्गाचे सर्वेक्षण करताना इथल्या नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास विचारात घेतला होता का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. महामार्गाला असलेली वळणे, चिपळूणजवळ कामथे, परशुराम आदी घाटातील डोंगरात गरज नसताना केलेल्या अनावश्यक भरावांची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाळी स्थिती पाहता चिपळूणनजीकचा परशुराम घाट भविष्यात वन वे करावा लागेल अशी दाट शक्यता आहे. त्याचा विचार आत्ताच करायला हवा आहे.