शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या माध्यमातून सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने घेतला आहे.

पर्यावरण जागरूकता वाढू लागल्याने त्यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१० साली राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) ही विशेष न्याययंत्रणा स्थापन केली आहे. ‘एनजीटी’च्या अधिकार कक्षेत प्रामुख्याने जलप्रदूषण कायदा-१९७४, वनसंवर्धन कायदा-१९८०, वायुप्रदूषण कायदा-१९८१, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६, सार्वजनिक दायित्व विमा कायदा-१९९१ आणि जैविक विविधता कायदा-२००२ अंतर्गत कोकण व चिपळूणशी संबंधित असलेल्या समस्यांवर दाद मागितली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकणच्या समस्या कायदेशीर पद्धतीने मांडत असल्याबद्दल ॲड. ओवेस पेचकर यांचा ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.च्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी ग्लोबल चिपळूणचे चेअरमन श्रीराम रेडीज, मनोज गांधी, धीरज वाटेकर, विश्वास पाटील, प्रल्हाद लाड, विलास महाडिक आदी उपस्थित होते. या वेळी चेअरमन श्रीराम रेडीज म्हणाले, सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरावामुळे हा जणू चेक डॅम बनला आहे. कोकणात सर्वत्र दरडी कोसळताहेत. महामार्गाचे सर्वेक्षण करताना इथल्या नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास विचारात घेतला होता का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. महामार्गाला असलेली वळणे, चिपळूणजवळ कामथे, परशुराम आदी घाटातील डोंगरात गरज नसताना केलेल्या अनावश्यक भरावांची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाळी स्थिती पाहता चिपळूणनजीकचा परशुराम घाट भविष्यात वन वे करावा लागेल अशी दाट शक्यता आहे. त्याचा विचार आत्ताच करायला हवा आहे.