शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

By admin | Updated: July 22, 2014 22:49 IST

पाणी रे पाणी : २४ सदनिकाधारकांची वणवण

चिपळूण : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी शहरातील खेंड परिसरात असणाऱ्या एका सदनिकेमधील २४ कुटुंबीयांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे प्रश्न मांडूनही गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे या सदनिकेतील रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खेंड भागात सिल्व्हर पॅलेस सदनिकेत २४ कुटुंबीय राहात आहेत. एप्रिल महिन्यापासून या सदनिकेतील रहिवाशांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत येथील महिलांनी नगरपरिषदेवरही धडक देऊन पाणी समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाला विनंती केली. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी येथील सदनिकाधारकांची पाणी समस्या सुटलेली नाही. याबाबत आज (मंगळवारी) येथील काही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रफीक सुर्वे यांची भेट घेतली व चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने अखेर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची भेट घेऊन पाणी समस्येचा प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले. सदनिकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने दैनंदिन व्यवहार कसे करायचे, असा सवालही रहिवाशांंनी केला. सुधारित नळपाणी योजना सुरु झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष शाह यांनी दिले. मात्र, तोपर्यंत सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खेंड भागातील पाणी टंचाई तीव्र रूप धारण करीत असल्याने येथील सदनिकाधारकांनी गेले अनेक दिवस पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न चालविले होते मात्र त्या प्रयत्नाना यश आलेले नाही.शहरातील मोठ्या लोकवस्तीच्या भागाला पाणी टंर्चािला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नाराजीवर उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनी लियाकत शहा यांची भेट घेतली व त्याच्याकडून शब्द घेतल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)-चिपळूण शहरातील विकसित होत असलेला भाग म्हणून खेंड भागाकडे पाहिले जात आहे. येथे असणाऱ्या नागरी सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन महिने यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य पालिकेने दाखविले नाही, पाणी पुरवठा विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.चिपळूण नगरपालिकेच्या पाणी विभागाकडे २४ सदनिकाधारकांनी आजपर्यंत अनेक वेळा संपर्क साधला व पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील खेंड भागात नागरिकांनी पावसात पाण्यासाठी वणवण करणे, हे क्लेषदायक असल्याची प्रतिक्रिया तेथून व्यक्त करण्यात आली.