शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

By admin | Updated: July 22, 2014 22:49 IST

पाणी रे पाणी : २४ सदनिकाधारकांची वणवण

चिपळूण : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी शहरातील खेंड परिसरात असणाऱ्या एका सदनिकेमधील २४ कुटुंबीयांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे प्रश्न मांडूनही गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे या सदनिकेतील रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खेंड भागात सिल्व्हर पॅलेस सदनिकेत २४ कुटुंबीय राहात आहेत. एप्रिल महिन्यापासून या सदनिकेतील रहिवाशांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत येथील महिलांनी नगरपरिषदेवरही धडक देऊन पाणी समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाला विनंती केली. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी येथील सदनिकाधारकांची पाणी समस्या सुटलेली नाही. याबाबत आज (मंगळवारी) येथील काही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रफीक सुर्वे यांची भेट घेतली व चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने अखेर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची भेट घेऊन पाणी समस्येचा प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले. सदनिकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने दैनंदिन व्यवहार कसे करायचे, असा सवालही रहिवाशांंनी केला. सुधारित नळपाणी योजना सुरु झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष शाह यांनी दिले. मात्र, तोपर्यंत सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खेंड भागातील पाणी टंचाई तीव्र रूप धारण करीत असल्याने येथील सदनिकाधारकांनी गेले अनेक दिवस पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न चालविले होते मात्र त्या प्रयत्नाना यश आलेले नाही.शहरातील मोठ्या लोकवस्तीच्या भागाला पाणी टंर्चािला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नाराजीवर उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनी लियाकत शहा यांची भेट घेतली व त्याच्याकडून शब्द घेतल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)-चिपळूण शहरातील विकसित होत असलेला भाग म्हणून खेंड भागाकडे पाहिले जात आहे. येथे असणाऱ्या नागरी सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन महिने यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य पालिकेने दाखविले नाही, पाणी पुरवठा विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.चिपळूण नगरपालिकेच्या पाणी विभागाकडे २४ सदनिकाधारकांनी आजपर्यंत अनेक वेळा संपर्क साधला व पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील खेंड भागात नागरिकांनी पावसात पाण्यासाठी वणवण करणे, हे क्लेषदायक असल्याची प्रतिक्रिया तेथून व्यक्त करण्यात आली.