शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पावसामुळे भात उत्पादनात होणार घट

By admin | Updated: July 28, 2015 00:28 IST

वाढ खुंटली : जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी यावर्षी कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनात किमान १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भात लागवडीचे समाधान मिळाले असले तरी भाताची प्रत्यक्ष वाढ खुंटली आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, दुय्यम शेती नागलीची केली जाते. पावसावर अवलंबून असलेली भातशेती लागवड प्रक्रिया यावर्षी पावसाअभावी रखडली आहे. पाणथळ तसेच पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रातील भात लागवड प्राधान्याने पूर्ण करण्यात आली तरी डोंगराळ भागातील शेती लागवडीस मात्र विलंब झाला. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४४ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. नागली पिकाची १४ हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असली तरी अद्याप ४ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड पूर्ण झाली आहे. जुलै महिना संपला तरी लागवडीची कामे अद्याप प्रलंबित आहेत. शिवाय लागवडीसाठी विलंब झाल्यामुळे भातरोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अजूनही म्हणावा तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. उन्हामुळे रोपे पिवळट पडली आहेत. शिवाय भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे फुटवे अद्याप चांगल्या प्रकारे झालेले नाहीत. फुटवेच झाले नसल्यामुळे पुढे भाताच्या लोंबीवर त्याचा परिणाम होणार आहे. भाताची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ भात लागवडीचे समाधान लाभत आहे. त्यामुळे यावर्षी भाताची उत्पादकता घटण्याचे संकेत दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)