शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

राजापूर तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना ...

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ग्रामीण भागात काही गावांत वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.

शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार धरली होती. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस पडला होता. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. मात्र मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे कोदवली व अर्जुना नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवस संततधार पडलेल्या पर्जन्यवृष्टीत ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही मोठी वित्तहानी व जीवित हानी झालेली नाही. हातिवले येथील संजय शिवराम शिंदे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ओणी कोंडवाडी येथील अनंत कृष्णा रहाटे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. कोळवणखडी येथील नीता शिवाजी मोरे यांच्या घराची पडझड झाली आहे. कुंभवडे जि. प. शाळा नं. २ ची संरक्षक भिंत कोसळली असून, चौके येथील प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराची पडझड झाली आहे.

शनिवार ते मंगळवार या कालावधीत झालेल्या पावसातील नुकसानीबाबत स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी कर्मचारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.