शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राजापूर तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना ...

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ग्रामीण भागात काही गावांत वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.

शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार धरली होती. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस पडला होता. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. मात्र मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे कोदवली व अर्जुना नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवस संततधार पडलेल्या पर्जन्यवृष्टीत ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही मोठी वित्तहानी व जीवित हानी झालेली नाही. हातिवले येथील संजय शिवराम शिंदे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ओणी कोंडवाडी येथील अनंत कृष्णा रहाटे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. कोळवणखडी येथील नीता शिवाजी मोरे यांच्या घराची पडझड झाली आहे. कुंभवडे जि. प. शाळा नं. २ ची संरक्षक भिंत कोसळली असून, चौके येथील प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराची पडझड झाली आहे.

शनिवार ते मंगळवार या कालावधीत झालेल्या पावसातील नुकसानीबाबत स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी कर्मचारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.