शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना ...

राजापूर : गेले दोन दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ग्रामीण भागात काही गावांत वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.

शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत संततधार धरली होती. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस पडला होता. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. मात्र मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे कोदवली व अर्जुना नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवस संततधार पडलेल्या पर्जन्यवृष्टीत ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही मोठी वित्तहानी व जीवित हानी झालेली नाही. हातिवले येथील संजय शिवराम शिंदे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ओणी कोंडवाडी येथील अनंत कृष्णा रहाटे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. कोळवणखडी येथील नीता शिवाजी मोरे यांच्या घराची पडझड झाली आहे. कुंभवडे जि. प. शाळा नं. २ ची संरक्षक भिंत कोसळली असून, चौके येथील प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराची पडझड झाली आहे.

शनिवार ते मंगळवार या कालावधीत झालेल्या पावसातील नुकसानीबाबत स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी कर्मचारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.