शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

खेड तालुक्यात पावसाची पुन्हा रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी हैराण झाला आहे.

कोकणात हळवी आणि महान अशी दोन प्रकारची पिके घेतली जातात. जी शेती पाणथळ असते त्या शेतीत महान (उशिरा पिकणारी शेती), तर वरकस शेतीमध्ये हळवी (लवकर पिकणारी शेती) केली जाते. पाऊस बेताचा झाला तर हळवी शेती ही गणेशोत्सवादरम्यान काढणीला येते, तर महान शेती काढणीला दिवाळी उजाडते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हळव्या शेतीबाबत शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. गणेशोत्सव उरकल्यानंतर लगेच हळव्या पिकाची काढणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात केली असल्याने शेतात पिकलेल्या हळव्या पिकाचे नुकसान होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्वी भात, नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही कोकणातील प्रमुख पिके होती. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात ही पिके घेत असत. मात्र अलीकडच्या काळात नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही पिके कालबाह्य झाली आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडेनासे झाले असल्याने कोकणातील शेतकरी अन्य पिके पिकविण्याचा नाद सोडून केवळ भातशेती पिकवत आहे. मात्र, ती शेतीही पावसाच्या लहरीपणाची शिकार होत असल्याने वर्षभर शेतीत काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हाताला फारसे काही लागत नाही.

गेल्या वर्षी पाऊस बेताचा झाल्याने शेतकऱ्याला शेतीतून चार दाणे अधिकचे मिळाले होते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस कोसळला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेती वाहून गेल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. आता हळवी पिके शेतातून खळ्यात घ्यायची वेळ असताना पुन्हा पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केल्याने शेतकऱ्याची चिंता कमालीची वाढली आहे.