शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

खेड तालुक्यात पावसाची पुन्हा रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी हैराण झाला आहे.

कोकणात हळवी आणि महान अशी दोन प्रकारची पिके घेतली जातात. जी शेती पाणथळ असते त्या शेतीत महान (उशिरा पिकणारी शेती), तर वरकस शेतीमध्ये हळवी (लवकर पिकणारी शेती) केली जाते. पाऊस बेताचा झाला तर हळवी शेती ही गणेशोत्सवादरम्यान काढणीला येते, तर महान शेती काढणीला दिवाळी उजाडते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हळव्या शेतीबाबत शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. गणेशोत्सव उरकल्यानंतर लगेच हळव्या पिकाची काढणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात केली असल्याने शेतात पिकलेल्या हळव्या पिकाचे नुकसान होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्वी भात, नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही कोकणातील प्रमुख पिके होती. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात ही पिके घेत असत. मात्र अलीकडच्या काळात नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही पिके कालबाह्य झाली आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडेनासे झाले असल्याने कोकणातील शेतकरी अन्य पिके पिकविण्याचा नाद सोडून केवळ भातशेती पिकवत आहे. मात्र, ती शेतीही पावसाच्या लहरीपणाची शिकार होत असल्याने वर्षभर शेतीत काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हाताला फारसे काही लागत नाही.

गेल्या वर्षी पाऊस बेताचा झाल्याने शेतकऱ्याला शेतीतून चार दाणे अधिकचे मिळाले होते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस कोसळला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेती वाहून गेल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. आता हळवी पिके शेतातून खळ्यात घ्यायची वेळ असताना पुन्हा पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केल्याने शेतकऱ्याची चिंता कमालीची वाढली आहे.