शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

खेड तालुक्यात पावसाची पुन्हा रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...

खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी हैराण झाला आहे.

कोकणात हळवी आणि महान अशी दोन प्रकारची पिके घेतली जातात. जी शेती पाणथळ असते त्या शेतीत महान (उशिरा पिकणारी शेती), तर वरकस शेतीमध्ये हळवी (लवकर पिकणारी शेती) केली जाते. पाऊस बेताचा झाला तर हळवी शेती ही गणेशोत्सवादरम्यान काढणीला येते, तर महान शेती काढणीला दिवाळी उजाडते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हळव्या शेतीबाबत शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. गणेशोत्सव उरकल्यानंतर लगेच हळव्या पिकाची काढणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात केली असल्याने शेतात पिकलेल्या हळव्या पिकाचे नुकसान होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर्वी भात, नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही कोकणातील प्रमुख पिके होती. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात ही पिके घेत असत. मात्र अलीकडच्या काळात नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही पिके कालबाह्य झाली आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडेनासे झाले असल्याने कोकणातील शेतकरी अन्य पिके पिकविण्याचा नाद सोडून केवळ भातशेती पिकवत आहे. मात्र, ती शेतीही पावसाच्या लहरीपणाची शिकार होत असल्याने वर्षभर शेतीत काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हाताला फारसे काही लागत नाही.

गेल्या वर्षी पाऊस बेताचा झाल्याने शेतकऱ्याला शेतीतून चार दाणे अधिकचे मिळाले होते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस कोसळला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेती वाहून गेल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. आता हळवी पिके शेतातून खळ्यात घ्यायची वेळ असताना पुन्हा पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केल्याने शेतकऱ्याची चिंता कमालीची वाढली आहे.