शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली पाऊस लहरी झाला आहे. यंदा सातत्याने सुरू असलेल्या वादळांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. यंदा जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सलग काही दिवस अतिवृष्टीमुळे चार महिन्यांची सरासरी सव्वातीन महिन्यातच पावसाने ओलांडली आहे.

२००५ सालापासून कोकणात अतिवृष्टी होत असून, दरड कोसळणे, रस्ते, भूभाग खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. सध्या पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. कधी सरासरीपेक्षा अतिशय कमी तर कधी अतिवृष्टीचा कहर सुरू झाला आहे. २०१९ साली २ जुलै आणि २०२१ साली २२ जुलै या दिवशी रत्नागिरीसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने महापूर आल्याने हाहाकार उडाला होता. या दोन्ही साली ऑगस्ट - सप्टेंबर या दोन्हीही महिन्यांमध्ये जोरदार पडलेल्या पावसाने चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी या शहरांबरोबरच तालुक्यांमधील अन्य भागात पाणी भरण्याच्या घटना घडल्या होत्या. घरांमध्ये, शेतीमध्येही पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा जूनपासूनच पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू झाली. जुलै महिन्यातही लक्षणीय पाऊस झाला. मात्र, ऑगस्टपर्यंत जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या निम्म्यापेक्षाही पाऊस कमी झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात केवळ ४६० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ७ आणि ८ तारखेला झालेल्या अतिवृष्टीने या दोन दिवसांतच २६३.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ८ सप्टेंबरलाच पावसाने ३३६४ मिलिमीटर ही वार्षिक सरासरीचा रेकाॅर्ड मोडत ३४२५ मिलिमीटरपर्यंत मजल मारली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरअखेर पावसाने ३५७० मिलिमीटरपर्यंत मजल मारली आहे.

सप्टेंबर पावसाचा महिना?

जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यांत पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर जुलैअखेर १८१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा धडाकेबाज सुरुवात केल्याने या महिन्याच्या तेरा दिवसांतच ५३७.६४ मिलिमीटरची मजल मारली आहे. सप्टेंबर महिन्यात ४७० मिलीमीटर पाऊस पडणे अपेेक्षित असते. मात्र, आतापर्यंतच एवढा पाऊस झाला असून, हवामान खात्याने अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरणार आहे.