शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली पाऊस लहरी झाला आहे. यंदा सातत्याने सुरू असलेल्या वादळांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. यंदा जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सलग काही दिवस अतिवृष्टीमुळे चार महिन्यांची सरासरी सव्वातीन महिन्यातच पावसाने ओलांडली आहे.

२००५ सालापासून कोकणात अतिवृष्टी होत असून, दरड कोसळणे, रस्ते, भूभाग खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. सध्या पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. कधी सरासरीपेक्षा अतिशय कमी तर कधी अतिवृष्टीचा कहर सुरू झाला आहे. २०१९ साली २ जुलै आणि २०२१ साली २२ जुलै या दिवशी रत्नागिरीसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने महापूर आल्याने हाहाकार उडाला होता. या दोन्ही साली ऑगस्ट - सप्टेंबर या दोन्हीही महिन्यांमध्ये जोरदार पडलेल्या पावसाने चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी या शहरांबरोबरच तालुक्यांमधील अन्य भागात पाणी भरण्याच्या घटना घडल्या होत्या. घरांमध्ये, शेतीमध्येही पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा जूनपासूनच पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू झाली. जुलै महिन्यातही लक्षणीय पाऊस झाला. मात्र, ऑगस्टपर्यंत जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या निम्म्यापेक्षाही पाऊस कमी झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात केवळ ४६० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ७ आणि ८ तारखेला झालेल्या अतिवृष्टीने या दोन दिवसांतच २६३.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ८ सप्टेंबरलाच पावसाने ३३६४ मिलिमीटर ही वार्षिक सरासरीचा रेकाॅर्ड मोडत ३४२५ मिलिमीटरपर्यंत मजल मारली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरअखेर पावसाने ३५७० मिलिमीटरपर्यंत मजल मारली आहे.

सप्टेंबर पावसाचा महिना?

जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यांत पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर जुलैअखेर १८१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा धडाकेबाज सुरुवात केल्याने या महिन्याच्या तेरा दिवसांतच ५३७.६४ मिलिमीटरची मजल मारली आहे. सप्टेंबर महिन्यात ४७० मिलीमीटर पाऊस पडणे अपेेक्षित असते. मात्र, आतापर्यंतच एवढा पाऊस झाला असून, हवामान खात्याने अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरणार आहे.