शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस रुसला...!

By admin | Updated: July 1, 2014 00:27 IST

अकरा वर्षात यंदा गाठला नीचांक रत्नागिरीतील स्थिती

रत्नागिरी : पावसाने यावर्षी पाठ फिरवली असून, गेल्या अकरा वर्षातील जून महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा यावर्षी जून महिन्यात पडलेला पाऊस हा सर्वात कमी आहे. गेल्या अकरा वर्षात गतवर्षी २०१३ साली जूनमध्ये पडलेला पाऊस सर्वाधिक होता.दरवर्षी ७ जूनला पडणारा पाऊस यावर्षी मात्र, अजूनही गायबच आहे. तुरळक सरी वगळता म्हणावा तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. त्यामुळे पावसाची सगळीच नक्षत्र कोरडी यंदा जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भरपेट पाणी पुरवणारी पावसाची हुकमी नक्षत्र कोरडी गेल्याने आता शेतकऱ्याकडे वाट पाहण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.पावसावर विसंबून पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पेरण्याही झालेल्या आहेत. मात्र, पाऊसच गायब झाल्याने पुढील कामे रखडली आहेत. उन्हाचाही कडाका वाढल्याने आता पाऊस या एक दोन दिवसात पडला नाही तर रोपे सुकण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्क्त केली जात आहे.जाणकारांच्या मते जूनमध्ये पाऊस पडला नाही तरी जुलैमध्ये जोरदार पडेल. मात्र, सध्या पावसाबद्दल कुठलेच भाकीत करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या ११ वर्षात प्रत्येक वर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेने या वर्षीच्या जून महिन्यात पडलेला पाऊस सर्वात कमी (सरासरी २९७.३७ मिलीमीटर )आहे.जून २०१३ मध्ये सर्वाधिक (सरासरी १३४८ मिलीमीटर) पावसाची नोंद आहे. हा जून महिना कोरडा गेला असला तरी आता एक दोन दिवसात पाऊस सुरू होण्याचे संकेत मिळत असले तरी उकाडाही तेवढाच असह्य झाला आहे. त्यामुळे पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. पाऊस गायब झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)