शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

जायखेडा परिसरात पाऊस

By admin | Updated: April 6, 2016 22:57 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : कांद्याचे नुकसान होण्याची भीती

जायखेडा : येथील परिसरासह सटाणा तालुक्यातील बहुतांशी भागात बुधवारी सकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. ढगाळ हवामान वाढल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच कांद्याचेही नुकसान होणार असल्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. डाळींब व अन्य नगदी पिके आधीच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली आहे. कळवण, देवळा, सटाण्यासह मालेगाव तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. महागडे बियाणे घेऊन दुष्काळावर मात करीत कांद्याचे थोडेफार पीक शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यातच बाजारभाव गडगडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना कांदे सोडून द्यावे लागले आहेत. अशा दुष्टचक्र ात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा अस्मानी संकट घोंगावत आहे. दुष्काळावर मात करीत पिकवलेला कांदा काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला आहे. वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा प्लॅस्टिकच्या कागदांनी झाकून पाण्यापासून वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)