शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : रविवार रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू ...

रत्नागिरी : रविवार रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. अधूनमधून उन्हाचे दर्शन होत असले तरी मध्येच जोरदार सरी कोसळत आहेत. रविवार सकाळपासूनच जोरदार सरी कोसळू लागल्या होत्या. रात्रीही पावसाने चांगलाच जोर धरला होता. हवामान खात्याने ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सोमवारी सकाळीही पावसाने अधिकच जोर घेतला. सकाळी जोरदार सर कोसळल्यानंतर काही काळ उन्हे पडू लागली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. पावसाची संततधार सुरू राहिल्याने वातावरणातही चांगलाच गारठा निर्माण झाला. सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. अजूनही दोन दिवस पाऊस मुसळधारेने पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पाऊस तंतोतंत खरा करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात पावसाचे जोरदार ‘कम बॅक’ झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. परंतु यावेळी पाऊस अजूनही जोरदार पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा पाऊस असाच राहिला तर शेतीचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे अजूनही पाऊस हवा असला तरीही त्याचे प्रमाण मर्यादित राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.