शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : रविवार रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू ...

रत्नागिरी : रविवार रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. अधूनमधून उन्हाचे दर्शन होत असले तरी मध्येच जोरदार सरी कोसळत आहेत. रविवार सकाळपासूनच जोरदार सरी कोसळू लागल्या होत्या. रात्रीही पावसाने चांगलाच जोर धरला होता. हवामान खात्याने ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सोमवारी सकाळीही पावसाने अधिकच जोर घेतला. सकाळी जोरदार सर कोसळल्यानंतर काही काळ उन्हे पडू लागली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. पावसाची संततधार सुरू राहिल्याने वातावरणातही चांगलाच गारठा निर्माण झाला. सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. अजूनही दोन दिवस पाऊस मुसळधारेने पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पाऊस तंतोतंत खरा करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात पावसाचे जोरदार ‘कम बॅक’ झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. परंतु यावेळी पाऊस अजूनही जोरदार पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा पाऊस असाच राहिला तर शेतीचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे अजूनही पाऊस हवा असला तरीही त्याचे प्रमाण मर्यादित राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.