शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

रत्नागिरी : गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातशेतीची कामे अविश्रांत सुरू आहेत. ...

रत्नागिरी : गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातशेतीची कामे अविश्रांत सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७९५६.८० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. समुद्र मात्र खवळलेला असून, किनाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना झाल्याची नोंद नाही.

जिल्ह्यात २४ तासात १२३.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील रामचंद्र बैकर यांच्या घराचे पावसामुळे काहीअंशी नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी, बावनदी या नद्यांनी निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची पातळी गाठली आहे. सरीवर पाऊस सुरू असला तरी भात लागवडीच्या कामात मात्र व्यत्यय आलेला नाही. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. यावर्षी पाऊस सुरूवातीपासून चांगला झाल्याने शेतीची कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मंडणगड तालुक्यात ८५२.७० मिलिमीटर, दापोली ६३५ मिलिमीटर, खेड १२७४.१० मिलिमीटर, गुहागर ९८६.७० मिलिमीटर, चिपळूण ८३०.६० मिलिमीटर, संगमेश्वर ८९२.५० मिलिमीटर, रत्नागिरी ९७५.१० मिलिमीटर, लांजा ७८१.३० मिलिमीटर, राजापूर तालुक्यात ७२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्यात झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २,२८८.०७ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.