शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नव्या रेल्वेमार्गाला त्वरित प्रारंभ

By admin | Updated: August 21, 2016 22:38 IST

सुरेश प्रभू : ‘जयगड-भोके, रोहा-दिघी, चिपळूण-कराड’चा समावेश

खेड : कोकणचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जयगड ते भोके, रोहा ते दिघी आणि चिपळूण ते कराड या नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ५ तालुके सागरी मार्गाने जोडण्यात येणार आहेत, नजीकच्या काळात कोकणात रेल्वे आणि सागरी मार्गाचे जाळे तयार होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. खेड तालुक्यातील कळंबणी येथे नव्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता रिमोटद्वारे करण्यात आले. यानिमित्त भरणे येथील पाटीदार भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रभू बोलत होते. या रेल्वे स्थानकासाठी ९ कोटी ५५ लाखांचा खर्च होणार आहे. कळंबणी खुर्द, कळंबणी बुद्रुक, उधळे खुर्द व उधळे बुद्रुक, चिंचवली, आपेडे, बोरघर, वावे या गावांना नवीन स्थानकाचा लाभ होणार आहे. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, आमदार संजय कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा बेलोसे, खेडचे सभापती चंद्रकांत कदम उपस्थित होते. कोकण विकासाचा मोठा बॅकलॉग आणि येथील जनतेच्या अपेक्षांचा बॅकलॉग मी भरून काढणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते व आपण स्वत: कोकणातील खासदार आहोत.़ आता नसलो तरीही मोदी यांनी आपल्याला रेल्वे मंत्री केले आणि पुन्हा कोकणची जबाबदारी टाकली, मला समाधान वाटले. कोकणात सध्या ११ नवी रेल्वे स्थानके मंजूर केली असून, या कामाचे भूमिपूजन तर काही कामांची उद्घाटने केली आहेत. खेडमधून अनेकांनी कोकण रेल्वेच्या जलद गाड्यांना खेड येथे थांबा मिळण्यासाठी केलेल्या मागणीवर अनंत गीते व आम्ही एकत्र बसून अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करू व निदान दोन गाड्यांसाठी थांबा निश्चित करणार असल्याचे आश्वासन दिले. पूर्वीच्या एका दिवसाला रेल्वेचे ४ किमीचे रस्ते तयार करण्याच्या गतीच्या तुलनेत आता १९ किमी गती वाढवली असून, या नव्या गतीमुळेच कोकण रेल्वेची अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे सांगितले. रेल्वेतील नोकऱ्या, परीक्षा आणि कामांचे ई - टेंडरिंग हे सर्व आता आॅनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. लवकरच या कामाला यश मिळणार असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीची रेल्वेची प्रतिवर्षी ४० हजार कोटी रूपयांची कामे होत होती. आपण रेल्वे मंत्री झाल्यानंतर हा वेग वाढविला आहे. सध्या १ लाख २१ हजार कोटी रुपयांची कामे रेल्वेची होत आहेत, असे ते म्हणाले. कोकणात होऊ घातलेल्या रेल्वेच्या ३० हजार कोटींच्या कामामध्ये फडणवीस यांनी १० हजार कोटीची मदत देणार असल्याचे सांगितले असून, कोकण विकासात हा मोठा दिलास मिळाला आहे. यावेळी केंद्रीय अवजड व उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सूरेश प्रभू यांच्यासमवेत मंत्रालयात लवकरच एक बैठक घेणार असून, यामध्ये खेड रेल्वे स्थानकात ४ जलद गाड्यांच्या थांब्याबाबत लवकरच विचारविनिमय करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) पत्र एकत्र केली अन् कामाला लागलो : प्रभू याअगोदर अनेक रेल्वेमंत्री होऊन गेले. या कोकणातील जनतेने कोकण रेल्वेबाबत अनेक निवेदने व पत्र दिली होती. ही पत्र त्यावेळी एका बाजूला सारण्यात आली होती. त्यावेळी एकही काम होत नव्हते. आपण रेल्वेमंत्री झाल्यानंतर ही सर्व पत्र शोधून काढली. अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी न पटणारी उत्तरे दिली. ती सारी पत्र एकत्र केली आणि कोकण रेल्वेबाबतच्या सर्व अडचणी टप्प्याटप्प्याने दूर करण्याच्या हेतूने प्रयत्न करू लागलो आहे.