शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षा लांबल्याने प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची ...

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची संधी गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी, बारावीचा निकाल हाती येईपर्यंत राष्ट्रीयस्तरावरील प्रक्रिया संपेल का, याबाबतची चिंता विद्यार्थी, पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल-मे मध्ये निश्चित करण्यात आले होते. वेळापत्रक जाहीर झाले, बारावीचे हॉलतिकीटही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. लांबलेल्या परीक्षेमुळे कित्येक विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्र निवडण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट अशा विविध परीक्षांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित आहे. मात्र, राज्य मंडळाच्या परीक्षा लांबल्याने निकालास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुणपत्रिका, कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी लागणारा विलंब. त्यात मे-जूनचे वेळापत्रकही निश्चित असेल की, नाही याची खात्री नाही. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरील संधीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एनडीए परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. जेईई तिसरी फेरी २७ ते ३० एप्रिल, चौथी फेरी २४ ते २८ मे दरम्यान होणार आहे. १ ऑगस्ट रोजी नीट, ३ जुलै रोजी जेईई अ‍ॅॅडव्हान्स, क्लॅट १३ जून, भारताबाहेरील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एस.एटी’ परीक्षा ८ जून, एसएससी-सीजीएल २९ मे ते ७ जून, बीटस पिलानी २४ ते ३० जून दरम्यान होणार आहेत. बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीची जूनच्या शेवटपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर प्रात्यक्षिक, त्यानंतर निकाल लागणार आहेत. त्यामुळे निकालाला ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.