शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

दहावी, बारावीच्या परीक्षा लांबल्याने प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची ...

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची संधी गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी, बारावीचा निकाल हाती येईपर्यंत राष्ट्रीयस्तरावरील प्रक्रिया संपेल का, याबाबतची चिंता विद्यार्थी, पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल-मे मध्ये निश्चित करण्यात आले होते. वेळापत्रक जाहीर झाले, बारावीचे हॉलतिकीटही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. लांबलेल्या परीक्षेमुळे कित्येक विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्र निवडण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट अशा विविध परीक्षांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित आहे. मात्र, राज्य मंडळाच्या परीक्षा लांबल्याने निकालास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुणपत्रिका, कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी लागणारा विलंब. त्यात मे-जूनचे वेळापत्रकही निश्चित असेल की, नाही याची खात्री नाही. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरील संधीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एनडीए परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. जेईई तिसरी फेरी २७ ते ३० एप्रिल, चौथी फेरी २४ ते २८ मे दरम्यान होणार आहे. १ ऑगस्ट रोजी नीट, ३ जुलै रोजी जेईई अ‍ॅॅडव्हान्स, क्लॅट १३ जून, भारताबाहेरील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एस.एटी’ परीक्षा ८ जून, एसएससी-सीजीएल २९ मे ते ७ जून, बीटस पिलानी २४ ते ३० जून दरम्यान होणार आहेत. बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीची जूनच्या शेवटपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर प्रात्यक्षिक, त्यानंतर निकाल लागणार आहेत. त्यामुळे निकालाला ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.