शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

दुग्धव्यवसाय वाढीसाठी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी; पण...

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दुधाळ जनावरांच्या वाटपाबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाऱ्यांचे ठोंब वितरीत करण्यात येत आहेत. पण, असे असले तरीही दुग्ध व्यवसायाची फार मोठी प्रगती झालेली नाही.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, बचत गट, मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. १ हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३० हजार ते १ लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत.यावर्षी जयवंत, यशवंत जातीचे गवताचे सुमारे ६ लाख ठोंबांचे वितरण करण्यात येणार आहे. पडिक जमिनीबरोबर शेताच्या बांधावर किंवा कलमांच्या बागेत आंतरपीक म्हणून चाऱ्याचे उत्पादन घेता येऊ शकेल. उत्पादित चारा गुरांसाठी ठेऊन अधिकचा चारा विकता येऊ शकेल. साडेतीन रूपये किलो दराने चारा विक्रीतून शेतकऱ्याला अर्थार्जन मिळू शकते. तसेच निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून कमी खर्चात व उपलब्ध साहित्याचा वापर करून उत्कृष्ट चारा निर्मितीचे प्रात्यक्षिकांव्दारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या युरिया, मीठ, झारी, प्लास्टिक कापड, माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. अशिय सोपी, कमी खर्चिक, उपलब्धतेनुसार चारा निर्मिती करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.जनावरांच्या मलमुत्रापासून पैदास होणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उरलेला चारा, शेण, मूत्र योग्य प्रमाणात एकत्र करून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी लागणारा डिंक पोजर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. एकूणच शेतकऱ्यांना शेती व दुग्धपालन व्यवसायाव्दारे अन्य छोटेमोठे जोडधंदे करून अर्थार्जन करणे सोपे होत आहे.सध्या जिल्ह्यात एक लाख ९० हजार ५५६ मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध आहे. तसेच २२ हजार ७०४ मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबला होता. परिणामी शेतकऱ्यांमध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या चारा मुबलक स्वरूपात उपलब्ध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)