शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धव्यवसाय वाढीसाठी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी; पण...

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दुधाळ जनावरांच्या वाटपाबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाऱ्यांचे ठोंब वितरीत करण्यात येत आहेत. पण, असे असले तरीही दुग्ध व्यवसायाची फार मोठी प्रगती झालेली नाही.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, बचत गट, मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. १ हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३० हजार ते १ लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत.यावर्षी जयवंत, यशवंत जातीचे गवताचे सुमारे ६ लाख ठोंबांचे वितरण करण्यात येणार आहे. पडिक जमिनीबरोबर शेताच्या बांधावर किंवा कलमांच्या बागेत आंतरपीक म्हणून चाऱ्याचे उत्पादन घेता येऊ शकेल. उत्पादित चारा गुरांसाठी ठेऊन अधिकचा चारा विकता येऊ शकेल. साडेतीन रूपये किलो दराने चारा विक्रीतून शेतकऱ्याला अर्थार्जन मिळू शकते. तसेच निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून कमी खर्चात व उपलब्ध साहित्याचा वापर करून उत्कृष्ट चारा निर्मितीचे प्रात्यक्षिकांव्दारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या युरिया, मीठ, झारी, प्लास्टिक कापड, माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. अशिय सोपी, कमी खर्चिक, उपलब्धतेनुसार चारा निर्मिती करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.जनावरांच्या मलमुत्रापासून पैदास होणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उरलेला चारा, शेण, मूत्र योग्य प्रमाणात एकत्र करून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी लागणारा डिंक पोजर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. एकूणच शेतकऱ्यांना शेती व दुग्धपालन व्यवसायाव्दारे अन्य छोटेमोठे जोडधंदे करून अर्थार्जन करणे सोपे होत आहे.सध्या जिल्ह्यात एक लाख ९० हजार ५५६ मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध आहे. तसेच २२ हजार ७०४ मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबला होता. परिणामी शेतकऱ्यांमध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या चारा मुबलक स्वरूपात उपलब्ध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)