शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी काम करणाऱ्यांना दे धक्का

By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST

एस. टी. महामंडळ : मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी बरखास्त केली नसून, संघटनाविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर केले आहे. रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी विभागाने केला आहे.महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी रद्द करुन नवीन कार्यकारिणी नियुक्त केली. मात्र, हा प्रकार हुकूमशाही पद्धतीचा असून, रद्द करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आगार सचिव सचिन वायंगणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.सचिन वायंगणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना रत्नागिरी आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे संघटनेच्या कोणत्याही मिटिंगला उपस्थित राहात नव्हते. संघटनेच्या खेड येथील वार्षिक मेळाव्यास तसेच १२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक मेळाव्याला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या वेळोवेळी होणाऱ्या सभेला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहात नाहीत. तसेच विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिवांच्या आदेशाचे पालन करीत नसल्यामुळे व आगारातील संघटनेच्या सभासदांच्या तक्रारी व मागण्यांचे आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार दुर्लक्ष करीत असल्यामुळे रत्नागिरी आगारातील बहुसंख्य सभासद वारंवार संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीकडे तक्रार करीत असल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.आगारातील संघटनेच्या सभासदांच्या मागण्यांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार स्वार्थ बघत असल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी २४ सप्टेंबरच्या विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार या फक्त तीन पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उर्वरित कार्यकारिणी पूर्वीप्रमाणेच कायम आहे. आगाराची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली नाही. फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार हे पदाधिकारी बदलले असल्याचे विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी सभेमध्ये जाहीर केले. रत्नागिरी विभागाच्या सचिवांनी सचिव पदाचा राजीनामा विभागीय अध्यक्षांकडे दिला होता. विभागीय कार्यकारिणीने तो राजीनामा मंजूर केल्याने अ‍ॅडव्हॉक समिती नेमली व त्यात विभागीय सचिवपदी रवींद्र लवेकर व कार्याध्यक्षपदी दत्ताराम घडशी यांची निवड केली. त्याला राज्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे, असे रत्नागिरी विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)