शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील वादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, दोन कोटी नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यात या चक्रीवादळात २३७ गावे बाधित झाली असून, यात १९१२ घटनांचे पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये एकूण दोन कोटी तीन लाख दहा हजार ४१५ रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रकिनाऱ्यावरील १३ गावांसह तालुक्यातील २३७ गावांना बसला आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, तीनजण किरकोळ जखमी होऊन त्यांना १२,९०० रुपयांचा फटका बसला. यामध्ये जनावरांना काेणतीही हानी पाेहाेचली नाही.

या चक्रीवादळाचा फटका राहत्या घरांना बसला. यामध्ये सहा घरे माेठ्या प्रमाणात बाधित झाली. त्यामध्ये चार पक्क्या घरांचे मिळून सात लाख ८० हजार, दोन कच्ची घरे बाधित होऊन त्यांचे तीन लाख २५ हजारांचे नुकसान झाले, तर ६३८ पक्की घरे अंशता बाधित होऊन चार लाख १४ हजार, तर २५५ कच्ची घरे बाधित होऊन १७ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. तर यामध्ये ४७ गोठ्यांची पडझड होऊन एक लाख १३ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले. तसेच १७ दुकानदार टपरीधारक यांचे एक लाख १५ हजार २५०, तर भांडी, कपडे यांचे सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

तर ८ अंगणवाडी इमारतींचे मिळून १६ लाख ९ हजार व ५ आरोग्य केंद्रांचे ८ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे, तर ७ आरोग्य उपकेंद्रांचे एक लाख ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले. एका साकवाचे नुकसान होऊन ३ लाख ५० हजारांचे, तर २ पिकअपशेड बाधित होऊन एक लाखाचे, तर दोन रस्ते वाहून गेल्याने एक कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये ७९२ फळ झाडे व जंगली झाडे बाधित होऊन ४७ लाख ८४ हजार १६० रुपयांचे नुकसान झाले. ५० जिल्हा परिषद शाळा इमारतींचे नुकसान होऊन ८ लाख ६९ हजार रुपयांचे, तर ६ माध्यमिक शाळांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर १२ ग्रामपंचायत मालमत्तेचे ७ लाख ७० हजार रुपयांचे, तर पशुसंवर्धन कार्यालयाचे ५ हजार रुपयांचे, तर १० हाेड्या व जाळी बाधित होऊन त्यांचे सुमारे ३ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडून मदत जाहीर झाल्यावर आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.