शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

राजापुरातील वादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, दोन कोटी नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यात या चक्रीवादळात २३७ गावे बाधित झाली असून, यात १९१२ घटनांचे पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये एकूण दोन कोटी तीन लाख दहा हजार ४१५ रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रकिनाऱ्यावरील १३ गावांसह तालुक्यातील २३७ गावांना बसला आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, तीनजण किरकोळ जखमी होऊन त्यांना १२,९०० रुपयांचा फटका बसला. यामध्ये जनावरांना काेणतीही हानी पाेहाेचली नाही.

या चक्रीवादळाचा फटका राहत्या घरांना बसला. यामध्ये सहा घरे माेठ्या प्रमाणात बाधित झाली. त्यामध्ये चार पक्क्या घरांचे मिळून सात लाख ८० हजार, दोन कच्ची घरे बाधित होऊन त्यांचे तीन लाख २५ हजारांचे नुकसान झाले, तर ६३८ पक्की घरे अंशता बाधित होऊन चार लाख १४ हजार, तर २५५ कच्ची घरे बाधित होऊन १७ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. तर यामध्ये ४७ गोठ्यांची पडझड होऊन एक लाख १३ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले. तसेच १७ दुकानदार टपरीधारक यांचे एक लाख १५ हजार २५०, तर भांडी, कपडे यांचे सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

तर ८ अंगणवाडी इमारतींचे मिळून १६ लाख ९ हजार व ५ आरोग्य केंद्रांचे ८ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे, तर ७ आरोग्य उपकेंद्रांचे एक लाख ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले. एका साकवाचे नुकसान होऊन ३ लाख ५० हजारांचे, तर २ पिकअपशेड बाधित होऊन एक लाखाचे, तर दोन रस्ते वाहून गेल्याने एक कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये ७९२ फळ झाडे व जंगली झाडे बाधित होऊन ४७ लाख ८४ हजार १६० रुपयांचे नुकसान झाले. ५० जिल्हा परिषद शाळा इमारतींचे नुकसान होऊन ८ लाख ६९ हजार रुपयांचे, तर ६ माध्यमिक शाळांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर १२ ग्रामपंचायत मालमत्तेचे ७ लाख ७० हजार रुपयांचे, तर पशुसंवर्धन कार्यालयाचे ५ हजार रुपयांचे, तर १० हाेड्या व जाळी बाधित होऊन त्यांचे सुमारे ३ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडून मदत जाहीर झाल्यावर आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.