शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

राजापुरातील वादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, दोन कोटी नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यात या चक्रीवादळात २३७ गावे बाधित झाली असून, यात १९१२ घटनांचे पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये एकूण दोन कोटी तीन लाख दहा हजार ४१५ रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रकिनाऱ्यावरील १३ गावांसह तालुक्यातील २३७ गावांना बसला आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, तीनजण किरकोळ जखमी होऊन त्यांना १२,९०० रुपयांचा फटका बसला. यामध्ये जनावरांना काेणतीही हानी पाेहाेचली नाही.

या चक्रीवादळाचा फटका राहत्या घरांना बसला. यामध्ये सहा घरे माेठ्या प्रमाणात बाधित झाली. त्यामध्ये चार पक्क्या घरांचे मिळून सात लाख ८० हजार, दोन कच्ची घरे बाधित होऊन त्यांचे तीन लाख २५ हजारांचे नुकसान झाले, तर ६३८ पक्की घरे अंशता बाधित होऊन चार लाख १४ हजार, तर २५५ कच्ची घरे बाधित होऊन १७ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. तर यामध्ये ४७ गोठ्यांची पडझड होऊन एक लाख १३ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले. तसेच १७ दुकानदार टपरीधारक यांचे एक लाख १५ हजार २५०, तर भांडी, कपडे यांचे सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

तर ८ अंगणवाडी इमारतींचे मिळून १६ लाख ९ हजार व ५ आरोग्य केंद्रांचे ८ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे, तर ७ आरोग्य उपकेंद्रांचे एक लाख ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले. एका साकवाचे नुकसान होऊन ३ लाख ५० हजारांचे, तर २ पिकअपशेड बाधित होऊन एक लाखाचे, तर दोन रस्ते वाहून गेल्याने एक कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये ७९२ फळ झाडे व जंगली झाडे बाधित होऊन ४७ लाख ८४ हजार १६० रुपयांचे नुकसान झाले. ५० जिल्हा परिषद शाळा इमारतींचे नुकसान होऊन ८ लाख ६९ हजार रुपयांचे, तर ६ माध्यमिक शाळांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर १२ ग्रामपंचायत मालमत्तेचे ७ लाख ७० हजार रुपयांचे, तर पशुसंवर्धन कार्यालयाचे ५ हजार रुपयांचे, तर १० हाेड्या व जाळी बाधित होऊन त्यांचे सुमारे ३ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडून मदत जाहीर झाल्यावर आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.