शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

लांजातील रस्ते कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग बेजबाबदार : दत्ताजी कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

वाटूळ : लांजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत होणारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा याबाबतीत सातत्याने तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत ...

वाटूळ : लांजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत होणारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा याबाबतीत सातत्याने तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने माजी बांधकाम सभापती दत्ताजी कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लांजा तालुक्यातील दळणवळण, रहदारीसाठीचे प्रमुख रस्ते नादुरुस्त असून, त्यांची मागील चार-पाच वर्षांपासून अतिशय दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर रत्नागिरी यांच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे. सातत्याने लेखी तक्रार अर्जही दाखल केले आहेत.

दाभोळे-शिपोशी, कोर्ले-वाटूळ रस्ता नूतनीकरण व विस्तारीकरण करण्याचे काम फेब्रुवारी २०२०पासून सुरु करण्यात आले होते. ही काम अतिशय संथगतीने होत असून, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. संबंधित रस्त्यावरील मोऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने होणाऱ्या हलगर्जीपणामुळे मागील पावसाळ्यापूर्वी याबाबत कळवूनही दखल घेतली नसल्याने या रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक व गैरसोयीची झाली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यातही अशाचप्रकारे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असून, लांजा तालुक्यातील सर्व नादुरुस्त, अर्धवट कामांची पाहणी करुन ३० एप्रिलपर्यंत सुधारणा करावी अन्यथा १ मेपासून जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दत्ताजी कदम यांनी दिला आहे.