शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

हातखंबा येथे उद्यापासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा ...

रत्नागिरी : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. १० ते १४ मे या कालावधीत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

हातखंबा परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या परिसरात काही व्यावसायिक सकाळच्या सत्रात दुकाने उघडी ठेवतात. महामार्गावर बाहेरून माल वाहतुकीची वाहने ये-जा करताना या ठिकाणी थांबतात. ती कोरोना स्प्रेडर बनल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हातखंबा परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांची कोरोना चाचणीही बंधनकारक केली जाणार आहे.

१५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या पाहून ग्रामकृती दल दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे. बंद कालावधीत दुकाने उघडी आढळल्यास त्यांना ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सर्व दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. या कालावधीत हॉटेल, किराणा दुकान, जनरल स्टोअर, दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेते यांचीही दुकाने बंद राहतील. डॉक्टर व औषधांची दुकाने अत्यावश्यक सुविधा म्हणून कायम सुरू राहतील. गावातील बँका, सेवा केंद्रे आणि महा-ई-सेवा केंद्रे पूर्णपणे बंद राहतील. सर्दी, ताप, खोकला आढळल्यास तत्काळ कळवावे, असे आवाहन ग्रामकृती दलाने केले आहे.