शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती

By admin | Updated: January 4, 2016 00:41 IST

पुस्तिकांचे वाटप : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रयत्न

रत्नागिरी : वाहतुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांसाठी पुस्तिका काढून ती या विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा मानस असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या वाहतुकीचे नियम माहीत नसणे, बेशिस्त वाहने हाकणे यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश जास्त असतो. सध्या अल्पवयीन मुलांनाही पालक दुचाकी घेऊन देतात. धूमस्टाईलने वाहन दामटवणे ही सध्या क्रेझ झाल्याने यामुळेही अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे गरजेचे असूनही किंवा चारचाकी चालकाने बेल्ट बांधणे आवश्यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अपघातावेळी जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत. या दृष्टीने या मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी वाहतुकीच्या नियमांची माहितीपुस्तिका काढून ती जिल्ह््यातील आठवी ते पदवीधर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. यापूर्वी दळवी यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने आता रत्नागिरीतही हा उपक्रम राबविण्याचा मानस दळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.येत्या १० जानेवारीपासून रत्नागिरी विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचे औचित्य साधून ही पुस्तिका अधिकाधीक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षेसंदर्भात जागृती झाल्यास बेशिस्त वाहने चालवणे तसेच वाहतुकीचे नियम मोडणे याबाबत जार्गती होईल. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास दळवी यांना आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये अशा पुस्तिका आठव्या इयत्तेवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हे कार्यालय प्रयत्न करणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी दिली. (प्रतिनिधी)