शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती

By admin | Updated: January 4, 2016 00:41 IST

पुस्तिकांचे वाटप : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रयत्न

रत्नागिरी : वाहतुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांसाठी पुस्तिका काढून ती या विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा मानस असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या वाहतुकीचे नियम माहीत नसणे, बेशिस्त वाहने हाकणे यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश जास्त असतो. सध्या अल्पवयीन मुलांनाही पालक दुचाकी घेऊन देतात. धूमस्टाईलने वाहन दामटवणे ही सध्या क्रेझ झाल्याने यामुळेही अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे गरजेचे असूनही किंवा चारचाकी चालकाने बेल्ट बांधणे आवश्यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अपघातावेळी जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत. या दृष्टीने या मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी वाहतुकीच्या नियमांची माहितीपुस्तिका काढून ती जिल्ह््यातील आठवी ते पदवीधर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. यापूर्वी दळवी यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने आता रत्नागिरीतही हा उपक्रम राबविण्याचा मानस दळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.येत्या १० जानेवारीपासून रत्नागिरी विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचे औचित्य साधून ही पुस्तिका अधिकाधीक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षेसंदर्भात जागृती झाल्यास बेशिस्त वाहने चालवणे तसेच वाहतुकीचे नियम मोडणे याबाबत जार्गती होईल. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास दळवी यांना आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये अशा पुस्तिका आठव्या इयत्तेवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हे कार्यालय प्रयत्न करणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी दिली. (प्रतिनिधी)