शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा निदर्शनाचा इशारा

By admin | Updated: October 16, 2015 22:47 IST

विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत.

चिपळूण : गडनदी प्रकल्पग्रस्त पाचांबे पुनर्वसन खेरशेत समितीच्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याची भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत दि. २ नोव्हेंबर रोजी निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. चिपळूण येथे शुक्रवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या कार्यालयात पाचांबे प्रकल्पग्रस्तांची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत. परंतु, आमचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उपजिल्हाधिकारी निगुडकर हे एफ ए कन्स्ट्रक्शनचे मालक म्हणून बैठकीत वागत होते. प्रकल्पग्रस्तांना ते योग्य उत्तरे देत नव्हते. कोयना धरणातील प्रकल्पग्रस्त जशी भीक मागत आहेत तशी तुमची स्थिती झालेली नाही, असे सांगून त्यांनी प्रकल्पग्रस्तांची अवहेलना केली. त्यामुळेच ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी आपला प्रयत्न आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी खेरशेत येथे १८० भूखंड मंजूर झाले. त्यातील ९० घरे तयार आहेत. प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरपट्टी नाही, जागा त्यांच्या नावावर नसल्याने कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. शिवाय साधे कर्जही काढता येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट सुरु आहे. आम्ही खेरशेत ग्रामपंचायतीत समाविष्ट व्हावे असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु, संपूर्ण गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत हवी असा निर्णय झाला आहे, असे अनिल कदम यांनी सांगितले. याबाबतही निगुडकर यांनी त्यांना आवाज बंद कर असे सुनावले. प्रकल्पग्रस्तांकडे शासनाचे दाखले असूनही त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आपल्या विविध मागण्या प्रकल्पग्रस्तांनी विस्ताराने मांडल्या. यावेळी निगुडकर यांनी रास्ता रोको किंवा आंदोलनाची स्टंटबाजी मला चालत नाही, असे सुनावले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अधिकच आक्रमक झाले आहेत. यावेळी शांताराम बल्लाळ, सुभाष बल्लाळ, महेश सावंत, गणेश निकम, पंकज सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. निगुडकर यांनी माफी मागावी अशी त्यांची अपेक्षा आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना निवेदन दिल्यानुसार राणे यांच्या नेतृत्वाखाली निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत.