शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रकल्पग्रस्तांचा निदर्शनाचा इशारा

By admin | Updated: October 16, 2015 22:47 IST

विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत.

चिपळूण : गडनदी प्रकल्पग्रस्त पाचांबे पुनर्वसन खेरशेत समितीच्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याची भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत दि. २ नोव्हेंबर रोजी निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. चिपळूण येथे शुक्रवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या कार्यालयात पाचांबे प्रकल्पग्रस्तांची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत. परंतु, आमचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उपजिल्हाधिकारी निगुडकर हे एफ ए कन्स्ट्रक्शनचे मालक म्हणून बैठकीत वागत होते. प्रकल्पग्रस्तांना ते योग्य उत्तरे देत नव्हते. कोयना धरणातील प्रकल्पग्रस्त जशी भीक मागत आहेत तशी तुमची स्थिती झालेली नाही, असे सांगून त्यांनी प्रकल्पग्रस्तांची अवहेलना केली. त्यामुळेच ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी आपला प्रयत्न आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी खेरशेत येथे १८० भूखंड मंजूर झाले. त्यातील ९० घरे तयार आहेत. प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरपट्टी नाही, जागा त्यांच्या नावावर नसल्याने कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. शिवाय साधे कर्जही काढता येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट सुरु आहे. आम्ही खेरशेत ग्रामपंचायतीत समाविष्ट व्हावे असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु, संपूर्ण गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत हवी असा निर्णय झाला आहे, असे अनिल कदम यांनी सांगितले. याबाबतही निगुडकर यांनी त्यांना आवाज बंद कर असे सुनावले. प्रकल्पग्रस्तांकडे शासनाचे दाखले असूनही त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आपल्या विविध मागण्या प्रकल्पग्रस्तांनी विस्ताराने मांडल्या. यावेळी निगुडकर यांनी रास्ता रोको किंवा आंदोलनाची स्टंटबाजी मला चालत नाही, असे सुनावले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अधिकच आक्रमक झाले आहेत. यावेळी शांताराम बल्लाळ, सुभाष बल्लाळ, महेश सावंत, गणेश निकम, पंकज सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. निगुडकर यांनी माफी मागावी अशी त्यांची अपेक्षा आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना निवेदन दिल्यानुसार राणे यांच्या नेतृत्वाखाली निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत.