शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

चिपळूण खोकेधारकांचा प्रस्ताव शासनाकडे जाणार

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

महषी कर्वे मंडई: दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन होऊन गाळेवाटप अधांतरीच

चिपळूण : शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे गेल्या दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झाले. मात्र, ही मंडई अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. मात्र, या मंडई परिसरातील खोकेधारकांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. १९ खोकेधारकांना लॉट पद्धतीने गाळे देण्याबाबतचा ठराव नुकताच नगर परिषदेच्या सभेत करण्यात आला असून हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविला जाणार असून, या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेपर्यंत खोकेधारकांना केवळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या ७ वर्षापूर्वी शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे नूतनीकरण करण्यासाठी ही मंडई तोडण्यात आली. मंडईमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मंडईच्या बाजूलाच तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. या मंडईचे २ महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले आहे. मात्र, गाळे देण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. या मंडई परिसरात अंदाजे १९ खोकेधारकांना भुईभाड्याने जागा देण्यात आली होती. मंडई तोडल्यानंतर आजपर्यंत या विस्तापितांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या खोकेधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुनही केवळ बोळवण केली जात आहे. या मंडई परिसरात गेल्या काही महिन्यापूर्वी ४ खोके बांधण्याचे काम सुरु होते. मात्र, विरोधी गटातील काही नगरसेवकांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या खोक्यांना स्थगिती देण्यात आली.हा विषय आता न्यायालयीन बाब बनला आहे. मात्र, खोकेधारकांचे पुनर्वसन व्हायला हवे असा उद्देश समोर ठेवून नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत लॉट पद्धतीने गाळे देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. गाळे देताना कोणावरही अन्याय होऊ नये अशी भूमिका घेऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही येत्या आठवडाभरात लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळणार की नाही, असा प्रश्न मात्र यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या गाळेवाटप प्रक्रियेस मंजुरी न मिळाल्या हा प्रश्न भिजत पडण्याची भीती खोकेधारकांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडईचे प्रत्यक्षात उद्घाटन झाले असले तरी ही मंडई आज अखेर सुरु झालेली नाही. मात्र, या गाळ्यांचा वापर काही भाजी विके्रते करीत असल्याचे चित्र आहे. कोणालाही गाळे देण्यात आलेले नसताना या गाळ्याचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने ‘आओ-जाओ घर तुम्हारा...’ अशी स्थिती दिसते.