शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

प्रस्ताव अजून पडून : राजापुरातील गोदामांच्या इमारतींना प्रतीक्षा

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

जीर्णावस्थेतील पुरातन इमारतींना ‘अच्छे दिन’ केव्हा?

राजापूर : राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्या सूचनेनंतर राजापुरातील गोदाम इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अनेक दिवस लोटले आहेत. त्याबाबत काहीच हालचाल न झाल्याने अत्यंत जीर्णावस्थेत गेलेल्या पुरातन इमारतींना अच्छे दिन केव्हा प्राप्त होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राजापूर शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयालगत पुरवठा विभागाची दोन गोदामे आहेत. या इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून, कशाबशा तग धरून उभ्या आहेत. दारे, खिडक्यांची दुरवस्था बनली आहे. त्या इमारतींत विजेची सोय नसल्याचे विदारक वास्तव राज्याचे अन्न पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी एके दिवशी रात्री अचानक दिलेल्या भेटीदरम्यान दिसून आले. त्यावेळी त्यांनी इमारतींची परिस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त केले. एवढ्या गोदामातीत विदारकता पाहून त्यांनी संबंधितांना फैलावर घेतले. त्यांनी तत्काळ या इमारतींच्या दुरुस्तींचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचनादेखील दिली होती. त्यानुसार राजापुरातून तशा स्वरुपाचा समारे दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठवून देण्यात आला, त्याला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पुढील काहीच कार्यवाही झालेली नाही. ही गोदामे जुनी असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पण शासनाला त्याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही हे प्रस्ताव धूळखात पडत असल्याचे आता दिसत आहे. या कामाला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी प्रस्ताव मागितल्यानंतरही कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे जनमानसातून आता या गोदामांना अच्छे दिन केव्हा प्राप्त होणार, याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)