शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

शैक्षणिक साहित्याचे वाटप देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ध्येयवादी युवा संघटनेतर्फे निवळी गावातील होतकरू नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...

शैक्षणिक साहित्याचे वाटप

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ध्येयवादी युवा संघटनेतर्फे निवळी गावातील होतकरू नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सचिव दैवत पवार यांनी स्वागत केले. वैभव पवार यांनी मार्गदर्शन केले.

खड्डे बुजविण्याची मागणी

दापोली : दापोली-मंडणगड मुख्य रस्त्यावर खेर्डी गावी झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत दापोली राष्ट्रवादी युवती आक्रमक झाल्या असून, याबाबत दापोली बांधकाम खात्याला पत्र देण्यात आले आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे या मार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महाई सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सेतू कार्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत.

मोफत आरोग्य शिबिर

चिपळूण : नॅब आय हाॅस्पिटलतर्फे खेड, गुहागर, मंडणगड या तालुक्यांतील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना डोळ्यांच्या विकारासंदर्भात मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ रोजी चिखली, दि. २० रोजी आंबवली, दि. २२ रोजी कडवई, दि. २७ रोजी खेड येथे हे शिबिर होणार आहे.

डाॅ. अभिषेक नागरगोजे यांची निवड

देवरूख : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्य सचिवपदी देवरूखचे डाॅ. अभिषेक गुलचंद नागरगोजे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हे, सहा विभागातून डाॅ. नागरगोजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी बसणी नागझरी येथे सागरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी श्रमदानातून झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. भर पावसात ग्रामस्थ त्यासाठी कार्यरत होते.

नेटवर्क समस्या

गणपतिपुळे : पावसामुळे भारत संचार निगम तसेच खासगी कंपन्यांची मोबाइल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. नेटवर्कअभावी शासकीय कार्यालये, बॅंका तसेच मुलांना अध्यापनात समस्या निर्माण होत आहे. नेटवर्क विस्कळीत झाल्यानंतर पूर्ववत करण्याकडे कंपन्याचे दुर्लक्ष होत आहे.