शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

शैक्षणिक साहित्याचे वाटप देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ध्येयवादी युवा संघटनेतर्फे निवळी गावातील होतकरू नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...

शैक्षणिक साहित्याचे वाटप

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ध्येयवादी युवा संघटनेतर्फे निवळी गावातील होतकरू नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सचिव दैवत पवार यांनी स्वागत केले. वैभव पवार यांनी मार्गदर्शन केले.

खड्डे बुजविण्याची मागणी

दापोली : दापोली-मंडणगड मुख्य रस्त्यावर खेर्डी गावी झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत दापोली राष्ट्रवादी युवती आक्रमक झाल्या असून, याबाबत दापोली बांधकाम खात्याला पत्र देण्यात आले आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे या मार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महाई सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सेतू कार्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत.

मोफत आरोग्य शिबिर

चिपळूण : नॅब आय हाॅस्पिटलतर्फे खेड, गुहागर, मंडणगड या तालुक्यांतील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना डोळ्यांच्या विकारासंदर्भात मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ रोजी चिखली, दि. २० रोजी आंबवली, दि. २२ रोजी कडवई, दि. २७ रोजी खेड येथे हे शिबिर होणार आहे.

डाॅ. अभिषेक नागरगोजे यांची निवड

देवरूख : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्य सचिवपदी देवरूखचे डाॅ. अभिषेक गुलचंद नागरगोजे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हे, सहा विभागातून डाॅ. नागरगोजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी बसणी नागझरी येथे सागरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी श्रमदानातून झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. भर पावसात ग्रामस्थ त्यासाठी कार्यरत होते.

नेटवर्क समस्या

गणपतिपुळे : पावसामुळे भारत संचार निगम तसेच खासगी कंपन्यांची मोबाइल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. नेटवर्कअभावी शासकीय कार्यालये, बॅंका तसेच मुलांना अध्यापनात समस्या निर्माण होत आहे. नेटवर्क विस्कळीत झाल्यानंतर पूर्ववत करण्याकडे कंपन्याचे दुर्लक्ष होत आहे.