शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

काजूच्या टरफलापासून तेल निर्मितीला प्रोत्साहन

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे.

एजाज पटेल-फुणगूस--काजूच्या टरफलापासून निघणारे तेल हे वाळवीप्रतिबंधक आहे. या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तरीही काजूच्या टरफलापासून तेल बनविणारी कारखानदारी कोकणात नाही, ही खंत आहे. काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे किमान १० ते १५ जणांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. यासाठी कोकणात सुशिक्षित बेकारांनी पुढे येण्याची गरज आहे. सध्या कोकणात काजूबिया तयार झाल्या असून, या बियांच्या खरेदीसाठी परप्रांतीय लोक वाडीवस्तीवर आईस्क्रिम तसेच टोस्ट - बटर घेऊन फिरु लागल्याचे चित्र दिसत आहे.अल्प मोबदल्यात परप्रांतीय लोक टनवारी काजूबी गोळा करतात आणि त्यातून लाखो रुपयांची माया गोळा करतात. कोकणातील काजूबियांचा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात असल्याचा आरोप केला जात आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी काजूची लागवड करायची, बिया धरल्यानंतर त्याची राखण करायची आणि प्रत्यक्षात फायदा मात्र परप्रांतीयांनी उठवायचा, असा प्रकार सध्या सुरु आहे. याला पायबंद घातला जावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. परप्रांतीय लोक कोकणात भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने आले आणि येथे आल्यानंतर चोरीचे भंगार गोळा करण्यापासून काजूबीपर्यंत सर्व व्यवसायावर आपली मक्तेदारी गाजवू लागले आहेत. कोकणातील आंबा, फणस, सागवान आणि जंगली वृक्ष खरेदी करण्याचा सपाटा या परप्रांतीयांनी लावला आहे. अल्पावधीतच कोकणचे रुपांतर बिहार, उत्तरप्रदेशमध्ये करण्याचा त्यांचा विचार असल्याचे पाहायला मिळेल.