शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काजूच्या टरफलापासून तेल निर्मितीला प्रोत्साहन

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे.

एजाज पटेल-फुणगूस--काजूच्या टरफलापासून निघणारे तेल हे वाळवीप्रतिबंधक आहे. या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तरीही काजूच्या टरफलापासून तेल बनविणारी कारखानदारी कोकणात नाही, ही खंत आहे. काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे किमान १० ते १५ जणांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. यासाठी कोकणात सुशिक्षित बेकारांनी पुढे येण्याची गरज आहे. सध्या कोकणात काजूबिया तयार झाल्या असून, या बियांच्या खरेदीसाठी परप्रांतीय लोक वाडीवस्तीवर आईस्क्रिम तसेच टोस्ट - बटर घेऊन फिरु लागल्याचे चित्र दिसत आहे.अल्प मोबदल्यात परप्रांतीय लोक टनवारी काजूबी गोळा करतात आणि त्यातून लाखो रुपयांची माया गोळा करतात. कोकणातील काजूबियांचा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात असल्याचा आरोप केला जात आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी काजूची लागवड करायची, बिया धरल्यानंतर त्याची राखण करायची आणि प्रत्यक्षात फायदा मात्र परप्रांतीयांनी उठवायचा, असा प्रकार सध्या सुरु आहे. याला पायबंद घातला जावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. परप्रांतीय लोक कोकणात भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने आले आणि येथे आल्यानंतर चोरीचे भंगार गोळा करण्यापासून काजूबीपर्यंत सर्व व्यवसायावर आपली मक्तेदारी गाजवू लागले आहेत. कोकणातील आंबा, फणस, सागवान आणि जंगली वृक्ष खरेदी करण्याचा सपाटा या परप्रांतीयांनी लावला आहे. अल्पावधीतच कोकणचे रुपांतर बिहार, उत्तरप्रदेशमध्ये करण्याचा त्यांचा विचार असल्याचे पाहायला मिळेल.