शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

वाहतूक प्रश्न जुलैअखेर सोडविण्याचे आश्वासन

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

महेश पाठक : जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनदुकानदारांच्या वाहतुकीचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांनी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीला दिले आहे, तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थापन समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, अशी सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.रत्नागिरीसह राज्यातील रास्तदर धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र, दुकानदारांना धान्याच्या वाहतुकीचा मिळणारा रिबेट २००५ सालापासून आहे तोच देण्यात येत असून तो अल्प आहे. रेशनदुकानांपर्यंत धान्य पोहोच करणे, रेशन दुकान व केरोसीन परवाना कायम करणे, विक्री कमिशन वाढवून मिळणे, साखर विक्री कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळणे, शासन निर्णयानुसार वाहतूक रिबेट मिळावा तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक व दुर्गम परिस्थितीनुसार विशेष वाहतूक रिबेट मिळावा, या सर्व मागण्या कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेने सोमवारी (दि. ११) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांची भेट घेतली. यावेळी पाठक यांनी वाहतूक रिबेटचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्याचे आश्वासन संघटनेला दिले. तसेच व्यवस्थापनविषयक इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देणार असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेनेचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव नितीन कांबळे, शशिकांत दळवी, विकास पवार, संतोष उतेकर, विजय राऊत, योगेश शिंदे, अनंत केंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)