शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

वाहतूक प्रश्न जुलैअखेर सोडविण्याचे आश्वासन

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

महेश पाठक : जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनदुकानदारांच्या वाहतुकीचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांनी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीला दिले आहे, तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थापन समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, अशी सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.रत्नागिरीसह राज्यातील रास्तदर धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र, दुकानदारांना धान्याच्या वाहतुकीचा मिळणारा रिबेट २००५ सालापासून आहे तोच देण्यात येत असून तो अल्प आहे. रेशनदुकानांपर्यंत धान्य पोहोच करणे, रेशन दुकान व केरोसीन परवाना कायम करणे, विक्री कमिशन वाढवून मिळणे, साखर विक्री कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळणे, शासन निर्णयानुसार वाहतूक रिबेट मिळावा तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक व दुर्गम परिस्थितीनुसार विशेष वाहतूक रिबेट मिळावा, या सर्व मागण्या कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेने सोमवारी (दि. ११) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांची भेट घेतली. यावेळी पाठक यांनी वाहतूक रिबेटचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्याचे आश्वासन संघटनेला दिले. तसेच व्यवस्थापनविषयक इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देणार असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेनेचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव नितीन कांबळे, शशिकांत दळवी, विकास पवार, संतोष उतेकर, विजय राऊत, योगेश शिंदे, अनंत केंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)