शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वाहतूक प्रश्न जुलैअखेर सोडविण्याचे आश्वासन

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

महेश पाठक : जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनदुकानदारांच्या वाहतुकीचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांनी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीला दिले आहे, तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थापन समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, अशी सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.रत्नागिरीसह राज्यातील रास्तदर धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र, दुकानदारांना धान्याच्या वाहतुकीचा मिळणारा रिबेट २००५ सालापासून आहे तोच देण्यात येत असून तो अल्प आहे. रेशनदुकानांपर्यंत धान्य पोहोच करणे, रेशन दुकान व केरोसीन परवाना कायम करणे, विक्री कमिशन वाढवून मिळणे, साखर विक्री कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळणे, शासन निर्णयानुसार वाहतूक रिबेट मिळावा तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक व दुर्गम परिस्थितीनुसार विशेष वाहतूक रिबेट मिळावा, या सर्व मागण्या कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेने सोमवारी (दि. ११) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांची भेट घेतली. यावेळी पाठक यांनी वाहतूक रिबेटचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्याचे आश्वासन संघटनेला दिले. तसेच व्यवस्थापनविषयक इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देणार असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेनेचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव नितीन कांबळे, शशिकांत दळवी, विकास पवार, संतोष उतेकर, विजय राऊत, योगेश शिंदे, अनंत केंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)