शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

प्रकल्प रेंगाळलेलेच!

By admin | Updated: November 19, 2014 23:17 IST

चिपळूण पालिका : कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी

चिपळूण : येथील नगर परिषदेचा कारभार म्हणजे आंधळं दळतयं आणि कुत्र पीठ खातयं... असाच आहे. शहरातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढत नाही. अनेक कामे दर्जाहीन, निकृष्ट होत असल्याने पैसे वाया जात आहेत. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. १०० टक्के कचरामुक्त शहर म्हणून चिपळूणचा गौरव आहे. या शहरात बऱ्यापैकी स्वच्छता आहे. सध्या कचराकुंड्या नसल्याने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. यासाठी कंत्राटी कामगार व नगर पालिका कर्मचारी कार्यरत आहेत. काही कामगार व कंत्राटी कामगार कामावर आहेत की नाहीत, याबाबत कोणाला फारशी माहिती नसते. शिवाय कामावर असणारे कर्मचारी समाधानकारक काम करत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. उद्यानांच्या डागडुजी व व्यवस्थापनासाठी नगर पालिका खर्च करते. परंतु, उद्यानांची स्थिती आजही भकास अशीच आहे. शहरातील क्रीडांगणाची स्थिती तर भयावह आहे. या क्रीडांगणाचा खेळापेक्षा मद्यपान व इतर गोष्टींसाठी अधिक वापर केला जातो. त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. मैदानाच्या आवारात मद्याच्या बाटल्या पडलेल्या असतात. रामतीर्थ तलाव परिसरात पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून झालेले कामही निकृष्ट आहे. येथील भिंती खचल्या होत्या. तेथे बांधण्यात आलेल्या झोपड्या अद्याप हटवण्यात आल्या नाहीत. भाजी मंडई, मटण मार्केट अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे रेंगाळली आहेत. हे प्रकल्प सुरु न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. नव्याने सुरु असलेल्या कोट्यवधी रुपयांची पाणी योजना अद्याप कार्यान्वित नाही. मटण मार्केट व मच्छी मार्केटमध्ये व्यापारी येणार नसतील तर पालिकेचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेतील अनेक कामात मनमानी केली जाते. मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जातात. त्यांच्या कामाचा दर्जा राखला जात नाही. काही वेळा तीचतीच कामे नाव बदलून केली जातात. अशा गोष्टी सभागृहात आल्या आहेत. जनरेटर खरेदीचा घोटाळाही यापूर्वी सभागृहात गाजला होता. शहराचा २० कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्प असतो. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार काम होताना दिसत नाही. शिवाय हा पैसा जातो कुठे, हा प्रश्नच आहे. नगरपालिका अनधिकृत बांधकाम, अनधिकृत हातगाड्या किंवा इतर साहित्य जप्त करते. हे जप्त केलेले साहित्य परस्पर विकले जाते. पालिकेने २५ लाखांच्या कचराकुंड्या काही वर्षांपूर्वी खरेदी केल्या होत्या. त्या कुठे गेल्या, हाही संशोधनाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंय...१०० टक्के कचरामुक्त शहर. शहरातील अनेक प्रकल्प अपूर्ण. वाहन, कचरा, पाणी योजनांचा गोंधळी कारभार. मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्याने कामाचा दर्जा खालावला.मटण मार्केट व मच्छी मार्केट बंद असल्याने उत्पन्नात घट. मंडई मोकळी; रस्त्यावर बाजार अशी स्थिती.सांडपाणी, मैला प्रक्रिया न करताच थेट जातो नदीत.एकूणच पालिकेचा कारभार दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विविध खात्यांचे प्रमुख, त्यांच्या हाताखाली कार्यरत असणारे अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याने किंवा कामात चालढकल करीत असल्यामुळे त्याचा लाभ इतरांना मिळतो. पर्यायाने नागरिकांसाठी असणाऱ्या अनेक सोयीसुविधा त्यांना मिळत नाहीत आणि यातूनच नागरिकांचा उद्रेक वाढतो. नगर पालिकेतील सत्ताधारी किंवा विरोधक आपापल्या मतावर ठाम न राहता एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करतात आणि यातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. या गोष्टी नियंत्रित व्हायला हव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.