शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लोकवस्तीतच प्रक्रिया-- गाडगेबाबा जयंती विशेष

By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST

रत्नागिरी पालिका : पन्नास टक्के कचरा रुग्णालयासमोरच पेटतो--दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच...

रत्नागिरी : शहरात सात प्रभाग असून प्रत्येक प्रभागात ५ ते ७ गुंठे जागेत छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील ५० टक्के कचऱ्यावर शहरातच प्रक्रिया होईल. उर्वरित कचऱ्यावर नियोजित दांडेआडोम घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. मात्र, दांडेआडोमचा घनकचरा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होणारच, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय शहरातील प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात तीन ते ५ लाखांपर्यंतचे कंपोस्ट खत बनवणारे मशिन बसवण्याची संकल्पना असून, त्यासाठी काही कंपन्यांशी चर्चाह झाली आहे. त्याबाबतचे प्रात्यक्षिकही झाले आहे. अशा मशिन्स अपार्टमेंट्सना स्वखर्चातून घ्याव्या लागणार आहेत. ज्या अपार्टमेंट नव्याने उभारल्या जाणार आहेत, त्यासाठी परवानगी देतानाच बिल्डर्सना कंपोस्ट खताची मशिन बसवण्याबाबत अट घालूनच परवानगी दिली जाणार आहे. या मशिनद्वारे दिवसाला त्या अपार्टमेंटमधून संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी वेगळ्या कुंड्या ठेवल्या जातील. ओल्या कचऱ्याचे खत तर सुक्या कचऱ्याची पावडर बनवली जाईल. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण आपोआप कमी होईल व दरदिवशी संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन कचऱ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल. निर्माण होणाऱ्या खताचा वापर त्या अपार्टमेंट्सना बागायतीसाठी करता येईल. उर्वरित कंपोस्ट खत विकणेही शक्य आहे. या मशिनसाठी विजेचा खर्चही कमी येणार असल्याची माहिती मयेकर यांनी दिली.रत्नागिरी शहरातील वाढत्या नागरिकरणासाठी स्वच्छता व कचऱ्याचे विघटन या दोन्ही गोष्टी आवश्यक असून अशा छोट्या प्रकल्पांनी शहराचे सौंदर्य अबाधित राहिल व त्यातून कचऱ्याचे निर्मूलन व कचरा मुक्तीही होईल पालिकेचा हेतू स्पष्ट असला तरीही घनकचरा प्रकल्प व त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागणार ्आहेत.(प्रतिनिधी)घोषणा झाली..रत्नागिरी नगरपालिकेने कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर मार्ग काढणारी क्लुप्ती शोधून काढली असून, शहरातील ७ प्रभागात स्वतंत्र छोटे घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पालिकेने असे प्रकल्प उभारताना वाहतूक खर्च वाचविणे व शहरातल्या शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावणे या दुहेरी हेतूने कचरा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, जागेची पाहणीही करण्यात आली आहे.रत्नागिरी शहरातील दोन प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर असा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यानंतर अन्यत्र ही कल्पना राबविली जाणार आहे.दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच...प्रकाश वराडकर- रत्नागिरीरत्नागिरी नगरपरिषदेने जंगजंग पछाडूनही दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. रस्त्याची जागा संपादन करूनही ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. तसेच दांडेआडोममधील प्रकल्प अंतराच्या दृष्टीने वाहतुकीलाही परवडणारा नसल्याने संपूर्ण क्षमतेचा प्रकल्प तेथे न उभारता शहराच्या प्रत्येक प्रभागातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा पर्याय समोर आला आहे. तसेच प्रत्येक अपार्टमेंटजवळ कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करणारी मशिन्स बसवण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे दांडेआडोम प्रकल्प होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. २००० साली राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदांनी त्यांच्या क्षेत्रात संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारावेत, असा आदेश होता. रत्नागिरी नगरपरिषदेने त्याचवेळी दांडेआडोम गावी अडीच एकर जागा खरेदी केली होती. मात्र, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता. तेथे घनकचरा प्रकल्प झाल्यास त्याचा गावाला त्रास होईल. सांडपाणी विहिरींमध्ये झिरपेल, दुर्गंधी निर्माण होईल, यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यामुळे ५०० मीटर्स लांबीच्या रस्त्याची जागा देण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. शासनाकडून घनकचरा प्रकल्पासाठी नगरपरिषदेवर दबाव येत होता. प्रकल्पासाठी पालिकेला निधीही प्राप्त झाला होता. रस्त्याची अडचण काही केल्या सुटत नव्हती. त्यामुळे आलेला निधी स्वच्छता विभागाच्या दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला. त्या पैशातून स्वच्छता विभागाला कचरा वाहतुकीसाठी लागणाऱ्या गाड्यांची खरेदी करण्यात आली. त्यानंतरही दांडेआडोम रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. पालिकेने दांडेआडोम प्रकल्प जागेपर्यंत जाण्यासाठी रस्त्याची जागा संपादीत करून मिळावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. महिनाभरापूर्वीच ही रस्त्याची जागा जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी पालिकेच्या ताब्यात दिली. मात्र, ज्यावेळी या प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी अधिकारी गेले. त्यानंतर पुन्हा तीव्र झाला आहे. याबाबाबत दांडेआडोम ग्रामपंचायत, फणसवळे ग्रामपंचायतींशी चर्चा करण्यासाठी तत्कालिन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष मयेकर, अन्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीतही या प्रकल्पाला असलेला विरोध कायम राहिला. रस्त्याची जागाही संपादीत करून घेतली आहे. त्यामुळे आज ना उद्या तेथे प्रकल्प करण्याची नगरपरिषदेची भूमिका कायम आहे. प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर दिला गेला तर दांडेआडोम प्रकल्पाची आवश्यकता नगरपरिषदेला भासणार नाही.