शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सर्वंकष मूल्यमापनाव्दारे विद्यार्थ्यांचा निकाल देण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, ...

रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रूची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये टक्केवारी न ठरवता अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वकष मूल्यमापन पध्दत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांचे शिक्षक सरसावले असून, काही शाळांनी दि. १० पर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

लॉकडाऊनमुळे शाळांमधील अध्यापन तर बंदच शिवाय अन्य शिक्षण संस्थांचे कामकाजही थांबले होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मूल्यमापन करून गुणपत्रिका बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गुणपत्रिका तयार करण्याची कामे सुरू आहेत.

वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीतर्फे बोर्डाच्या वगळता अन्य वर्गाच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली. परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण देण्याचे निश्चित केले आहे. शाळांनी गुणपत्रिकेचे काम हाती घेऊन, ऑनलाइन गुणपत्रिका वितरीत कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याने गुणपत्रिकेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सलग दोन वर्षे वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांमधून निकालपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून निकालासाठी शाळेत गर्दी होऊ नये यासाठी वर्गनिहाय तारखा निश्चित करून पालकांना वेळापत्रक व्हॉट‌्सअपवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दि.१० मे पर्यंत सर्व वर्गातील मुलांचे परीक्षा न देताच निकालपत्र हाती मिळण्याची शक्यता आहे.