शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

विद्यार्थ्यांसमोर समस्या जटील

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

रात्रशाळा : मुलांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी

वाटूळ : राज्यात २१० रात्रशाळा असून, त्यामध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी मुंबईमध्ये सुमारे १३६ शाळा असून, त्यात १३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दिवसाच्या शाळेतील मुलांच्या समस्या वेगळ्या, तर रात्रीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या खूप जटील असतात.रात्रशाळेत जाणाऱ्या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. शिक्षण नसल्याने दिवसभर श्रमाची कामे करून रात्रीच्या शाळेला जावे लागते. ती करून विद्यार्थी घरी न जाता परस्पर शाळेत जातात. दिवसभर काम करून थकल्यामुळे भूक लागते पण खाणार काय ? पगार कमी असल्याने घरच्या जबाबदारी पेलून खर्च कसा करायचा हा प्रश्न असतो. या परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करतात. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे म्हणाले.दिवसाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पोषण आहारासोबत पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविण्यात येतात. रात्रशाळेतील विद्यार्थी मात्र या सुविधांपासून वंचित आहेत. सरकारने या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून अशा सर्व इयत्तांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या सर्व मुलांना दिवसाच्या शाळांप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे. त्यांच्याकडे परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. राज्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)