शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

गडनदी धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप प्रलंबितच

By admin | Updated: March 5, 2016 00:01 IST

संगमेश्वर तालुका : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित राहिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. या समस्यांवर तोडगाच काढण्यात आलेला नाही. असे असताना गडनदी प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा दिला. अखेरीस प्रशासनाला जाग येऊ लाली आहे. धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत खेरशेत, नांदगाव, शिर्केवाडी, घाडगेवाडी या चार शासकीय तर येडगेवाडी व गायकरवाडी या दोन बाधित गावठाणांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येडगेवाडी रस्ता अडवणूक प्रकरणी विकासाच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. पुनर्वसन गावठाणातील अपूर्ण असलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दि. १९ डिसेंबर रोजी गडनदी पुनर्वसन गावठाणामधील अपूर्ण कामासंदर्भात दौरा केला होता. या दौऱ्यात अपूर्ण असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर कामांची अंदाजपत्रके तयार करुन ती सादर करावीत, अशा सूचना पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांची ११ कोटी ९७ लाख रुपयांची अंदाजपत्रके तयार केली. ही अंदाजपत्रके जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली. पुनर्वसन गावठाणांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांच्या यादीत गटारे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, नळपाणी योजना दुरुस्ती तसेच कुचांबे ते येडगेवाडी या मार्गाचे डांबरीकरण, आदी कामांचा समावेश आहे. तसेच खेरशेत पुनर्वसन गावठाणातील पाण्याची विहीर साफ करणे व ट्रान्सफार्मर ते स्मशानभूमी रस्ता खडीकरणासह आठ दिवसात तयार करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाला या बैठकीत देण्यात आल्या आहेत. शासकीय गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे सातबारे तातडीने कोरे करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कुचांबे ते येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यावेळी बैठकीला दिलीप सावंत, दिलीप गायकवाड, अरुण कदम, संतोष गायकवाड, तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सवाल : आम्ही आमच्या जमिनी का द्यायच्या?प्रलंंबित विकासकामांबाबत प्रकल्पग्रस्तांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, त्याला मूर्त स्वरूप आले नाही. अजून काही ठिकाणी प्राथमिक सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. मग आम्ही कोणत्याही विकासकामांसाठी जमिनी का द्यायच्या? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.प्रकल्पग्रस्त नाराजगडनदी धरणाचे काम एकीकडे पूर्णत्वास जात असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मात्र तशाच आहेत. ‘आधी धरण मग पुनर्वसन’ असे धोरण ठरवणाऱ्या शासनानेच आपले धोरण पायदळी तुडवल्याने प्रकल्पग्रस्त नाराजी व्यक्त करत आहेत.