शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांच्यासमोर मांडल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

वाटूळ : काजू उत्पादक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी काजू बी हमीभावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित ...

वाटूळ : काजू उत्पादक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी काजू बी हमीभावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी आमदार शेखर निकम हेही उपस्थित होते.

काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी १ किलो काजू बी उत्पादन करायला विद्यापीठांच्या माहितीनुसार १२५ रुपये खर्च येतो. त्यामुळे काजूला १५० हमीभाव व ५० रुपये अनुदान मिळावे. हमीभाव देणे शक्य नसेल, तर गोवा सरकारच्या धर्तीवर किमान किलोमागे ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काजू बीचा दर गेल्या ४ वर्षांपासून खाली उतरला आहे. बाहेरच्या देशातील म्हणजे आफ्रिकेमधील काजू बी आयात खर्च पकडून ७० रुपयाला मिळते. त्यामुळे किमान महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येणाऱ्या काजू बीवर आयात शुल्क वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. काजू बोंडाला डीसिल्ड प्रोसेसिंग म्हणजे वाईन स्वरूपात करण्यास महाराष्ट्र सरकारने द्राक्ष व संत्र्याच्या धर्तीवर परवानगी द्यावी. वायनरीला परवानगी देता येत नसेल, तर बोंडांपासून बायोडिझेल व इथेनॉलसारखे इंधन तयार करणारे प्रकल्प उभारले जावेत, ओले काजूगर सोलण्याचे यंत्र विकसित करावे, बाजारात विकल्या जाणाऱ्या काजूगरावर, ते कोणत्या भागातील आहेत, याचा उल्लेख करण्याचे बंधन घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या मागण्यांना अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पाच मागण्यांपैकी किमान ३ मागण्या मान्य होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.