शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

अजित पवार यांच्यासमोर मांडल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

वाटूळ : काजू उत्पादक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी काजू बी हमीभावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित ...

वाटूळ : काजू उत्पादक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी काजू बी हमीभावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी आमदार शेखर निकम हेही उपस्थित होते.

काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी १ किलो काजू बी उत्पादन करायला विद्यापीठांच्या माहितीनुसार १२५ रुपये खर्च येतो. त्यामुळे काजूला १५० हमीभाव व ५० रुपये अनुदान मिळावे. हमीभाव देणे शक्य नसेल, तर गोवा सरकारच्या धर्तीवर किमान किलोमागे ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काजू बीचा दर गेल्या ४ वर्षांपासून खाली उतरला आहे. बाहेरच्या देशातील म्हणजे आफ्रिकेमधील काजू बी आयात खर्च पकडून ७० रुपयाला मिळते. त्यामुळे किमान महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येणाऱ्या काजू बीवर आयात शुल्क वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. काजू बोंडाला डीसिल्ड प्रोसेसिंग म्हणजे वाईन स्वरूपात करण्यास महाराष्ट्र सरकारने द्राक्ष व संत्र्याच्या धर्तीवर परवानगी द्यावी. वायनरीला परवानगी देता येत नसेल, तर बोंडांपासून बायोडिझेल व इथेनॉलसारखे इंधन तयार करणारे प्रकल्प उभारले जावेत, ओले काजूगर सोलण्याचे यंत्र विकसित करावे, बाजारात विकल्या जाणाऱ्या काजूगरावर, ते कोणत्या भागातील आहेत, याचा उल्लेख करण्याचे बंधन घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या मागण्यांना अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पाच मागण्यांपैकी किमान ३ मागण्या मान्य होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.