शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

उर्दू भवन उभारण्यास हिंदुत्ववादी संस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST

रत्नागिरी : उर्दू भाषेच्या विकासासाठी रत्नागिरीतही ‘उर्दू भवन’ उभारण्यात येत आहे. या उर्दू भवनाला रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह ...

रत्नागिरी : उर्दू भाषेच्या विकासासाठी रत्नागिरीतही ‘उर्दू भवन’ उभारण्यात येत आहे. या उर्दू भवनाला रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह अन्य १४ हिंदुत्ववादी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्याकडे गुरूवारी संयुक्तरित्या सादर करण्यात आले. यावेळी या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उर्दू भाषेचा विकास आणि उर्दू साहित्याचा प्रसार यासाठी राज्यातील मुख्य शहरांमध्ये उर्दू भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथे उभारण्यात आलेल्या पहिल्याच उर्दू भवनामध्ये अवैध धंदे चालू झाल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. तरी शूरवीर स्वातंत्र्यवीरांची भूमी असलेल्या, समृद्ध गणेशोत्सवाचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही असे प्रकार होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उर्दू भवनास विरोध असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

उर्दूच्या विकासासाठी उर्दू घरे असे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र घरांच्या नावाखाली आलिशान इमारती उभारण्यात आल्या आहेत आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. अशा प्रकारे शासन आदेशातून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेला सांस्कृतिक वारसा आहे. मराठीतील संत वाड्.मय आणि साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. आज महाराष्ट्रात इंग्रजी भाषेचे स्तोम वाढले असून शासकीय कामकाजातही मराठीची अवहेलना दिसून येते. भाषाशुद्धी विषयी तर मराठीची दुरवस्था दिसून येते. राजभाषा मराठीची दुःस्थिती सुधारण्याऐवजी सरकार उर्दू भाषेचे एवढे उदात्तीकरण कशासाठी करत आहे ? असा प्रश्नही या निवेदनात करण्यात आला आहे.

या मागणीचा विचार करण्यात यावा, अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना संविधानिक पद्धतीने आंदोलन व निदर्शने करतील, असा इशारा यात देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रत्नागिरीतील हिंदू राष्ट्रसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू जनजागृती समिती, राजापूर येथील गुरव ज्ञाती समाज, ओंकार मित्रमंडळ, शिवस्मृती मंडळ, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भंडारी युवा मंच, जय गणेश मित्रमंडळ गणपतीपुळे, अपरान्त रत्नागिरी, श्री चंडिकादेवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे, गणपतीपुळे ग्रामस्थ, आम्ही फक्त शिवभक्त रत्नागिरी, समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटना लांजा तालुका, महाराष्ट्र वारकरी महामंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.