शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

भाज्यांचे दर ‘जैसे-थे’, फळांची आवक मुबलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकमुळे भाज्या, फळांची उपलब्धता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. चारचाकी वाहनांतून भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकमुळे भाज्या, फळांची उपलब्धता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. चारचाकी वाहनांतून भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी फिरत आहेत. गेले दोन आठवडे भाज्यांचे दर ‘जैसे थे’ आहेत. यावर्षी लाॅकडाऊनमुळे शिवाय कांद्याचे दरही जास्त असल्याने पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कांदा-बटाट्याला वाढती मागणी आहे. फळेही मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

भेंडी, गवार, घेवडा, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, शेवगा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर, फरसबी विक्रीसाठी उपलब्ध असून, बहुतांश भाज्यांचे दर ७० ते ८० रूपयांच्या घरात आहेत. टोमॅटो २० ते ३० रूपये तर वांगी ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कांदा २५ रूपये तर बटाटा २५ ते ३० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून भाज्या, कांदा, बटाटा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे भाज्या उपलब्ध होत असून, गेल्या आठवड्यापासून भाज्यांचे दरही ‘जैसे थे’ आहेत. पालेभाजी जुडी १० ते १५ रूपये दराने विकली जात आहे.

परराज्यातील आंबे सध्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नीलम, केशर, दशहरी, राघू, बलसाड आंब्यांना मागणी होत आहे. ६० ते १८० रूपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. पावसात आंबे भिजल्याने काळे पडत असून, कुजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात ६० ते ७० रूपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर मात्र आता आवाक्यात आले आहेत. २० ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.

गेले कित्येक महिने २२ ते २५ रूपये दर स्थिर असलेल्या बटाट्याचे दरात गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. २५ ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पावसामुळे बटाटा टिकत नसल्याची तक्रार ग्राहकांमधून होत आहे. पाच रूपयांनी दरात वाढ झाली आहे.

अनलाॅकमध्ये भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी येत आहेत. भाजी विक्रेते वाहने घेऊन गल्लोगल्ली, वाडीवस्तीवर फिरत असल्याने भाज्यांची उपलब्धता होत आहे. गावठी भाज्या श्रावणात उपलब्ध हाेणार असून, सध्या परजिल्ह्यातील भाज्यांचा वाढता खप आहे. ७० ते ८० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.

- राजश्री रेवाळे, गृहिणी

कांद्याच्या दरात घट मात्र बटाट्याच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे. वास्तविक कांदा, बटाट्याचा दैनंदिन स्वयंपाकात वापर केला जात असल्याने दर बऱ्यापैकी स्थिर असणे आवश्यक आहे. मात्र, दरातील चढ-उतारामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर महागाईचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

- कल्पना ठोंबरे, गृहिणी