शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

भाज्यांचे दर ‘जैसे-थे’, फळांची आवक मुबलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकमुळे भाज्या, फळांची उपलब्धता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. चारचाकी वाहनांतून भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकमुळे भाज्या, फळांची उपलब्धता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. चारचाकी वाहनांतून भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी फिरत आहेत. गेले दोन आठवडे भाज्यांचे दर ‘जैसे थे’ आहेत. यावर्षी लाॅकडाऊनमुळे शिवाय कांद्याचे दरही जास्त असल्याने पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कांदा-बटाट्याला वाढती मागणी आहे. फळेही मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

भेंडी, गवार, घेवडा, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, शेवगा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर, फरसबी विक्रीसाठी उपलब्ध असून, बहुतांश भाज्यांचे दर ७० ते ८० रूपयांच्या घरात आहेत. टोमॅटो २० ते ३० रूपये तर वांगी ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कांदा २५ रूपये तर बटाटा २५ ते ३० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून भाज्या, कांदा, बटाटा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे भाज्या उपलब्ध होत असून, गेल्या आठवड्यापासून भाज्यांचे दरही ‘जैसे थे’ आहेत. पालेभाजी जुडी १० ते १५ रूपये दराने विकली जात आहे.

परराज्यातील आंबे सध्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नीलम, केशर, दशहरी, राघू, बलसाड आंब्यांना मागणी होत आहे. ६० ते १८० रूपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. पावसात आंबे भिजल्याने काळे पडत असून, कुजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात ६० ते ७० रूपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर मात्र आता आवाक्यात आले आहेत. २० ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.

गेले कित्येक महिने २२ ते २५ रूपये दर स्थिर असलेल्या बटाट्याचे दरात गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. २५ ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पावसामुळे बटाटा टिकत नसल्याची तक्रार ग्राहकांमधून होत आहे. पाच रूपयांनी दरात वाढ झाली आहे.

अनलाॅकमध्ये भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी येत आहेत. भाजी विक्रेते वाहने घेऊन गल्लोगल्ली, वाडीवस्तीवर फिरत असल्याने भाज्यांची उपलब्धता होत आहे. गावठी भाज्या श्रावणात उपलब्ध हाेणार असून, सध्या परजिल्ह्यातील भाज्यांचा वाढता खप आहे. ७० ते ८० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.

- राजश्री रेवाळे, गृहिणी

कांद्याच्या दरात घट मात्र बटाट्याच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे. वास्तविक कांदा, बटाट्याचा दैनंदिन स्वयंपाकात वापर केला जात असल्याने दर बऱ्यापैकी स्थिर असणे आवश्यक आहे. मात्र, दरातील चढ-उतारामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर महागाईचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

- कल्पना ठोंबरे, गृहिणी