शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

साखरेपेक्षा गुळाचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील प्रत्येकाच्या घरात साखरेबराेबरच किंवा त्यापेक्षाही गुळाचे महत्त्व आहाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर औषधी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील प्रत्येकाच्या घरात साखरेबराेबरच किंवा त्यापेक्षाही गुळाचे महत्त्व आहाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर औषधी म्हणूनही गुळाकडे पाहिले जात असल्याने त्याचे स्थान स्वयंपाकघरात अढळ असेच आहे. सणासाठी आणि रोजच्या वापरासाठीही गुळाचा वापर नियमित केला जातो. मात्र, सध्या कोरोनाच्या दृष्टीने रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे विविध पदार्थ बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जाऊ लागला असल्याने आता गुळाला साखरेपेक्षाही मागणी वाढली आहे.

पित्त, खोकला यावर गुणकारी असलेल्या गुळात लोह आणि झिंक यांचे प्रमाण अधिक असते. गुळाचा औषधी गुणधर्म असल्याने तो आयुर्वेदिक औषधांमध्ये उदा. अनेक आसव यांच्यात वापरला जातो. काही औषधे गुळासोबत घेतल्यानेच ती प्रभावी ठरतात, हे आयुर्वेदातून सिद्ध झालं आहे.

सध्या कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असल्याने विविध प्रकारचे पाैष्टिक पदार्थ किंवा औषधी काढे बनविण्यासाठी सध्या गुळाचा वापर वाढला आहे. गूळ आणि गाईचे तूप यांचे मिश्रण असलेले अनेक पाैष्टिक पदार्थ प्रकृती उत्तम राखण्यास मदत करतात, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे सध्या कोरोनाकाळात या गुळाचा वापर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरात आता साखरेपेक्षा गुळाला अधिक महत्त्व आले आहे. गुळाच्या काळ्या चहाचीही पसंती वाढली आहे.

प्रकृतीसाठी गूळ उत्तम

गुळामधून लोह, झिंक मिळते. तुपासोबत पाैष्टिक पदार्थांत वापरला जातो. पित्त, कफ दूर करणारा, उन्हाचा शीण घालवणारा आहे. मात्र, तो जुना आणि मळीविरहीत असावा. त्यात दोषही आहेत, त्यामुळे त्याचा वापरही मर्यादेत करायला हवा.

- वैद्य सिद्धेश जोशी (आयुर्वेद), रत्नागिरी

n पूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर अधिक असायचा. साखरेचा वापर श्रीमंत करतात, असा समज होता.

n परंतु त्यानंतर साखर सामान्यांसाठी कमी दरात रेशन दुकानावर उपलब्ध होऊ लागली आणि गुळाचे दर वाढले.

n मागणीपेक्षाही उत्पादन वाढल्याने साखरेचा दर फारसा वाढला नाही. मात्र, गुळाचा दर वाढला.

n आयुर्वेदाने गुळाचे औषधी गुणधर्म आधीच सिद्ध केले होते. मात्र, काही काळानंतर ते लोकांच्या लक्षात आल्याने काळ्या चहाला पसंती मिळू लागली.

n कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुर्वेदिक काढे, काळा चहा यांचे महत्व वाढले. त्यामुळे गुळाच्या काळ्या चहाने स्टेटस वाढविली.

n सध्या बहुतांश आस्थापना, काही कार्यालयांमध्ये, काळ्या चहाला प्राधान्य दिले जात आहे.

गावात पूर्वी साखरेऐवजी गुळाचा वापर केला जात असे. त्यावेळी साखरेचा दरही गुळापेक्षा अधिक होता. मात्र, आता साखरेचा दर कमी झाला आहे. सामान्य जनतेला रेशनवर कमी दरात साखर मिळते. सणासुदीला अधिक दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आता साखर वापरली जात आहे.

- जयू पाखरे, व्यापारी, पाली (ता. रत्नागिरी)

तसं पाहिलं तर गुळाचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात होतो. काही पदार्थातील दोष घालविण्यासाठी किंवा औषधी गुणधर्मासाठी गूळ वापरला जातो. काेरोनाच्या काळात पाैष्टिक पदार्थ आणि औषधी गुणधर्माचा म्हणून गुळाचा खप वाढल्याचे दिसून येते.

- उदय पेठे,

व्यापारी, रत्नागिरी

कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर लोकांकडे गुळाचा वापर अधिक होऊ लागला आहे. पूर्वी शहरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता गुळाचे औषधी गुणधर्म लोकांना कळल्याने गूळ खरेदी करण्याकडे पूर्वीपेक्षा अधिक कल वाढला आहे.

- ओंकार शिंदे,

व्यापारी, रत्नागिरी.