शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखरेपेक्षा गुळाचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील प्रत्येकाच्या घरात साखरेबराेबरच किंवा त्यापेक्षाही गुळाचे महत्त्व आहाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर औषधी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील प्रत्येकाच्या घरात साखरेबराेबरच किंवा त्यापेक्षाही गुळाचे महत्त्व आहाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर औषधी म्हणूनही गुळाकडे पाहिले जात असल्याने त्याचे स्थान स्वयंपाकघरात अढळ असेच आहे. सणासाठी आणि रोजच्या वापरासाठीही गुळाचा वापर नियमित केला जातो. मात्र, सध्या कोरोनाच्या दृष्टीने रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे विविध पदार्थ बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जाऊ लागला असल्याने आता गुळाला साखरेपेक्षाही मागणी वाढली आहे.

पित्त, खोकला यावर गुणकारी असलेल्या गुळात लोह आणि झिंक यांचे प्रमाण अधिक असते. गुळाचा औषधी गुणधर्म असल्याने तो आयुर्वेदिक औषधांमध्ये उदा. अनेक आसव यांच्यात वापरला जातो. काही औषधे गुळासोबत घेतल्यानेच ती प्रभावी ठरतात, हे आयुर्वेदातून सिद्ध झालं आहे.

सध्या कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असल्याने विविध प्रकारचे पाैष्टिक पदार्थ किंवा औषधी काढे बनविण्यासाठी सध्या गुळाचा वापर वाढला आहे. गूळ आणि गाईचे तूप यांचे मिश्रण असलेले अनेक पाैष्टिक पदार्थ प्रकृती उत्तम राखण्यास मदत करतात, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे सध्या कोरोनाकाळात या गुळाचा वापर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरात आता साखरेपेक्षा गुळाला अधिक महत्त्व आले आहे. गुळाच्या काळ्या चहाचीही पसंती वाढली आहे.

प्रकृतीसाठी गूळ उत्तम

गुळामधून लोह, झिंक मिळते. तुपासोबत पाैष्टिक पदार्थांत वापरला जातो. पित्त, कफ दूर करणारा, उन्हाचा शीण घालवणारा आहे. मात्र, तो जुना आणि मळीविरहीत असावा. त्यात दोषही आहेत, त्यामुळे त्याचा वापरही मर्यादेत करायला हवा.

- वैद्य सिद्धेश जोशी (आयुर्वेद), रत्नागिरी

n पूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर अधिक असायचा. साखरेचा वापर श्रीमंत करतात, असा समज होता.

n परंतु त्यानंतर साखर सामान्यांसाठी कमी दरात रेशन दुकानावर उपलब्ध होऊ लागली आणि गुळाचे दर वाढले.

n मागणीपेक्षाही उत्पादन वाढल्याने साखरेचा दर फारसा वाढला नाही. मात्र, गुळाचा दर वाढला.

n आयुर्वेदाने गुळाचे औषधी गुणधर्म आधीच सिद्ध केले होते. मात्र, काही काळानंतर ते लोकांच्या लक्षात आल्याने काळ्या चहाला पसंती मिळू लागली.

n कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुर्वेदिक काढे, काळा चहा यांचे महत्व वाढले. त्यामुळे गुळाच्या काळ्या चहाने स्टेटस वाढविली.

n सध्या बहुतांश आस्थापना, काही कार्यालयांमध्ये, काळ्या चहाला प्राधान्य दिले जात आहे.

गावात पूर्वी साखरेऐवजी गुळाचा वापर केला जात असे. त्यावेळी साखरेचा दरही गुळापेक्षा अधिक होता. मात्र, आता साखरेचा दर कमी झाला आहे. सामान्य जनतेला रेशनवर कमी दरात साखर मिळते. सणासुदीला अधिक दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आता साखर वापरली जात आहे.

- जयू पाखरे, व्यापारी, पाली (ता. रत्नागिरी)

तसं पाहिलं तर गुळाचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात होतो. काही पदार्थातील दोष घालविण्यासाठी किंवा औषधी गुणधर्मासाठी गूळ वापरला जातो. काेरोनाच्या काळात पाैष्टिक पदार्थ आणि औषधी गुणधर्माचा म्हणून गुळाचा खप वाढल्याचे दिसून येते.

- उदय पेठे,

व्यापारी, रत्नागिरी

कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर लोकांकडे गुळाचा वापर अधिक होऊ लागला आहे. पूर्वी शहरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता गुळाचे औषधी गुणधर्म लोकांना कळल्याने गूळ खरेदी करण्याकडे पूर्वीपेक्षा अधिक कल वाढला आहे.

- ओंकार शिंदे,

व्यापारी, रत्नागिरी.