शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. गाव कृती आराखड्यामध्ये प्रत्येक आराखड्यामध्ये प्रत्येक कुटुंबाना समाविष्ट करून त्यांना नळजोडणी देण्यात यावी. त्यासाठी गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी केली आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लीटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. यामध्ये योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करून देणे आहे.

शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून गाव कृती आराखडा पंधरवडा सुरू आहे. हे अभियान कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘कोबो कलेक्ट’ या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने ही गाव कृती आराखड्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

-------------------------------------

तीन टप्प्यांत तयार हाेणार आराखडे

गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कक्षातर्फे पहिल्या टप्प्यात मंडणगड, दापाेली, राजापूर, दुसऱ्या टप्प्यात संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी व तिसऱ्या टप्प्यात चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक/ पंप ऑपरेटर, आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.