शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

कृषी विभागाची तयारी

By admin | Updated: December 1, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद : ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळाव्यांचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, आंबा बागायतदार संघाचे प्रतिनिधी, पंचायत समितीचा कृषी विभाग तसेच शेतकरी, बागायतदार या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात येणार आहेत. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील अंजने येथील कान्हेरे सभागृहात आणि गुहागर तालुक्यातील आरे येथील अभिजित भोसले यांच्या बागेत, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडणगड व दापोली या तालुक्यांसाठी केळशी येथील महावीर भवन येथे आणि चिपळूण तालुक्यातील मालदोली ग्रामपंचायत सभागृहात, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुक्यातील कशेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १मध्ये, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ग्रामपंचायत शेजारील गांगण यांच्या निवासस्थानी, दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी येथील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे, दि. १० रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतीशेजारी आणि लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत शेजारी जोशी यांच्या बागेत हा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. त्यासाठी कीटकनाशक हाताळणीबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटकनाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरुन आणखी १० लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)रब्बीची तयारी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आवारातील पिकामध्ये भर पडावी व त्यातून नवे तंत्र वापरात यावे हा हेतू.जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यातून प्रबोधनासाठी प्रयत्न करणार. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न करणार. आंबा, काजू पिकावरोबरच अन्य पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन. रोगप्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रयत्न.