शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाची तयारी

By admin | Updated: December 1, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद : ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळाव्यांचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, आंबा बागायतदार संघाचे प्रतिनिधी, पंचायत समितीचा कृषी विभाग तसेच शेतकरी, बागायतदार या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात येणार आहेत. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील अंजने येथील कान्हेरे सभागृहात आणि गुहागर तालुक्यातील आरे येथील अभिजित भोसले यांच्या बागेत, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडणगड व दापोली या तालुक्यांसाठी केळशी येथील महावीर भवन येथे आणि चिपळूण तालुक्यातील मालदोली ग्रामपंचायत सभागृहात, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुक्यातील कशेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १मध्ये, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ग्रामपंचायत शेजारील गांगण यांच्या निवासस्थानी, दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी येथील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे, दि. १० रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतीशेजारी आणि लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत शेजारी जोशी यांच्या बागेत हा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. त्यासाठी कीटकनाशक हाताळणीबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटकनाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरुन आणखी १० लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)रब्बीची तयारी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आवारातील पिकामध्ये भर पडावी व त्यातून नवे तंत्र वापरात यावे हा हेतू.जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यातून प्रबोधनासाठी प्रयत्न करणार. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न करणार. आंबा, काजू पिकावरोबरच अन्य पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन. रोगप्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रयत्न.