शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

तयारी आगोटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य एकत्रित मे महिन्यात खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू, कडधान्ये, साखर, मीठ, कांदे, बटाटे, ...

पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य एकत्रित मे महिन्यात खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू, कडधान्ये, साखर, मीठ, कांदे, बटाटे, लसूण यांचा साठा केला जातो. कडधान्य, डाळी, खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडल्याने पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणातील खरेदी थांबली आहे. मात्र, तरीही बजेटनुसारच खरेदी सुरू आहे. किराणाबरोबर मसाल्याचे पदार्थांना मागणी होत आहे. तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य, तेल, साखर यांची घाऊक स्वरूपात खरेदी करण्यात येते. गहू व भाकरीसाठीचे तांदूळ वेगळे वाळवून ठेवण्यात येत आहेत. तांदळाला कीड लागू नये, यासाठी बोरिक पावडर लावून ठेवण्यात येत आहे. डाळी, कडधान्ये यांची खरेदी करून ऊन्हात वाळत घातली जात आहेत. बाजारातून तयार मसाले विकत आणले तरी वर्षभर पुरेल इतके तिखट मात्र घरीच केले जाते. मसाल्याची लाल मिरची १८० ते ३५० रूपये, बडीशेप १८० ते २०० रुपये, जिरे १९० ते २२० रुपये, दालचिनी ५५० रूपये, लवंग ४०० रूपये, काळीमिरी ४५० रूपये, वेलची १२०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे घरातील आबालवृद्ध एकत्र आहेत. शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती असल्याने वाळवणासाठी महिला कर्मचाऱ्यांना वेळ मिळत आहे. मिरच्या, धणे, बडीशेप, जिरे, खडा गरम मसाला वेगवेगळा वाळवून भाजून एकत्रित गिरणीतून दळून आणला जातो. ३० ते ३५ रूपये प्रतिकिलो दराने मसाल्यांचे दळण सुरू आहे. सुट्यांच्या कालावधीत मसाले केले जातात. कोरोनामुळे मसाल्याच्या गिरणीतून गर्दी होऊ नये, यासाठी ग्राहकांना दळणावाले वेळ ठरवून देत आहेत. काही घरातून हळद पावडर केली जाते. अखंड हळकुंड एकत्र आणून, कात्रून दळण्यात येतात. मात्र, बचत गटाच्या माध्यमातून काही महिला हळदीची शेती करून तयार हळद पावडर करून विकत असल्याने अनेक भगिनींचे परिश्रम वाचले आहेत. २५० ते ३०० रूपये किलो दराने गावठी हळद विक्री सुरू आहे.

तांदळासाठी मागणी

तांदळांच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. चांगल्या प्रतिचा तांदूळ ३० ते ७० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. बासमती तुकडा ५० ते ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे तर अखंड बासमती अथवा बिर्याणी राईसची विक्री १०० ते ३०० रूपये किलो दराने सुरू आहे. साधारणत: वर्षभर पुरेल इतका तांदूळ एकत्रित खरेदी करण्यात येतो. तांदळाला बोरिक पावडर लावून तो सुरक्षित ठेवण्यात येत आहे. महागाईबरोबर छोट्या घरात साठवणूक करण्याची पंचाईत असल्यामुळे साधारणत: महिन्याला अथवा तीन महिन्याला पुरेल इतकाच तांदूळ खरेदी करण्यात येतो.

तयार पिठांना मागणी

कोकणात तांदळाची भाकरी प्राधान्याने खाल्ली जाते. त्यामुळे भाकरीचे तांदूळ धुवून ते वाळवून ठेवण्यात येतात. दोन वा त्यापेक्षा अधिक ऊनं लावून ठेवली तर भाकरीच्या पिठाचे तांदूळ खराब होत नाहीत. परंतु नोकरदार, व्यावसायिक महिलांना सध्या हे शक्य नाही. बाजारात तयार पिठे विकत मिळत असल्याने महिन्याच्या जिन्नसाबरोबर ज्वारी, तांदूळ, नाचणी एकूणच आवडीनुसार पिठे विकत आणण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिला मात्र भाकरीसाठीचे तांदूळ वाळवून ठेवत असल्याने घरोघरी तांदूळ धुवून वाळविण्याचे काम सुरू आहे. गव्हाच्या किमतीतही वाढ झाली आहे. गहू ३० ते ४५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. गहू विकत आणून दळणासाठी प्रतिकिलो सहा ते दहा रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे तयार गव्हाच्या पिठालाही मागणी होत आहे. पाच किलो तयार आटा १२० ते १५० रूपयांना मिळत असल्याने गहू आणून ते दळून आणण्यासाठी कष्ट घेण्यापेक्षा तयार पिठच खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे बेगमीच्या जिन्नसातून गव्हाचे प्रमाण कमी झाले आहे.

साखरेचे दर नियंत्रणात

साखरेचा खप नित्य असला, तरी गेल्या दोन वर्षात साखरेच्या दरात चढ-उतार झाला आहे. मात्र, साखरेचे दर नियंत्रणात असून, ३२ ते ३५ रूपये प्रतिकिलो दराने साखर विक्री सुरू आहे. पावसाळयात शेतकऱ्यांची धावपळ, शिवाय धो-धो कोसळणाऱ्या पावसात चहाचा खप अधिक असल्याने साखरेची खरेदी आवर्जून केली जाते. ५० किलो साखरेचे पोते १,५०० ते १,६०० रूपयांपर्यंत उपलब्ध होत असल्याने दोन ते तीन कुटुंबातून एकत्र साखर खरेदी करून विभागून घेण्यात येत आहे. साखरेबरोबर गुळही खरेदी केला जातो. पाव किलोपासून १० ते १५ किलोपर्यंतच्या गुळाच्या ढेपी विक्रीला उपलब्ध आहेत. केमिकलयुक्त गूळ पावसाळी वातावरणात टिकत नसल्यामुळे लागेल तितकाच गूळ खरेदी केला जातो.

खाद्यतेल भडकले

खाद्यतेलाचे दर भडकले आहेत. यापूर्वी १०० ते १२० रूपये लीटरने विकण्यात येणारे तेल सध्या १५० ते १७५ रूपये लीटर दराने विकण्यात येत आहे. सुर्यफूल, कापूस, सोयाबीन, शेंगदाणा तेल बाजारात उपलब्ध असून, एक लीटरच्या पिशव्या तसेच पाच लीटर ते १५ लीटरचे डबे, बॉक्स उपलब्ध आहेत. डब्यापेक्षा १० ते १२ लीटरच्या तेलाच्या बॉक्सना मागणी अधिक आहे. घरात ठेवण्यासाठी तसेच वापरण्यासाठी सोपे असल्याने तेल पिशव्यांचे बॉक्सच अधिकतम खरेदी केले जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. विविध खाद्यपदार्थ डालडा अथवा तुपात बनवले जातात. डालडा १०० ते १२० रूपये किलो दराने सुरू आहे. विविध कंपन्यांची ५० ग्रॅमपासून १ किलो, पाच किलो, १० किलोपर्यंत पॅकिंग उपलब्ध आहेत. विविध दुग्ध कंपन्यांतर्फे गाईचे, म्हशीचे तूपही बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. घरगुती तूप तयार केले जाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळेच कंपनीचे तूप खरेदी करण्यात येत आहे.