शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

महावितरणची मान्सूनपूर्व तयारी

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

महावितरण कंपनी : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न

रत्नागिरी : येणारा प्रत्येक पावसाळा महावितरण कंपनीकरिता एक आव्हान असतो. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये व ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.महावितरणची बहुतांश यंत्रणा ही उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. काही ठिकाणी त्या तारांना घासत असतात. त्यादृष्टीने संबंधित मालकांची पूर्वपरवानगी घेऊन फांद्या छटाईचे काम सुरु करण्यात आले आहे. तारांच्या घर्षणामुळे उंच माड, झाडे बहुधा पेटून होणारे अपघात टाळण्यासाठी छटाई करण्यात येत आहे.तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा यांचाही फटका यंत्रणेला बसतो. काही भागातला वीजपुरवठा यामुळे खंडित होतो. काहीवेळा पतंग उडविणाऱ्यांचा अतिउत्साह त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे अडकलेले पतंग, मांजा, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल ते वेळीच काढून टाकण्याची सूचना महावितरणने दिली आहे.तारांचे गार्डिंग ढिले झाल्याने तारा लोंबकळतात. शिवाय ढिले झालेले स्पॅन टाईट करण्याचे काम सुरु आहे. तसेच दोन खांबांमधील तारांचा झोल पडून जमिनीपासूनचे अंतर कमी होते. अशावेळी तारा ओढून घेणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी एखादा खांब बसवण्याची सूचनाही महावितरण कंपनीने केली आहे.खांबांचे ताण किंवा स्टे सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याबरोबर ढिल्या झालेल्या, लोंबकळणाऱ्या, तुटण्याच्या अवस्थेत असलेल्या तारांना वादळी वारे व पावसामुळे फटका बसू शकतो. ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तेल योग्य पातळीपर्यंत आहे का नाही, याची खात्री करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मरबद्दल आर्थिंग पावसाळ्यापूर्वी मजबूत करुन घेणे गरजेचे आहे. शिवाय पोल डिस्ट्रिब्युशन बॉक्स, फिडर पिलर्स, मिनी पिलर्स या सर्वांचे कामही तपासण्यात येत आहे.डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर, केबल जॉर्इंट याबाबतही खात्री करण्यात येत आहे. किमान साहित्य हाती बाळगून सुविधा तपासणीचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खांब कोसळणे, तारा तुटणे ट्रान्सफॉर्मर जळणे, डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर जळणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे महावितरण कंपनीने सर्व साहित्याचा जादा साठा करण्यास प्रारंभ केला असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.पायाभूत आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात एक हजार कोटी यंत्रणेचे विस्तारीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणने निधी दिला आहे. राज्यभरामध्ये या निधीचा अवलंब केला जाणार आहे. मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)