शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

माहेर संस्थेतील बालकांची पूरग्रस्तांना जगण्याचे बळ मिळावे, यासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरानजिकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमधील बालकांनी, राज्यातील पूरग्रस्त हतबल न होता ...

रत्नागिरी : शहरानजिकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमधील बालकांनी, राज्यातील पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, यासाठी प्रार्थना केली.

माहेरमध्ये अनेक अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित बालके व निराधार महिला पुरुष दाखल होत असतात. या सर्वांना आपुलकीने सांभाळण्याचे काम माहेर ही संस्था करीत आहे. सामाजिक संवेदनशीलता ही मुलांच्या अंगी बाणवावी, यासाठी विविध सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणात- रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, महाड या ठिकाणी महापुरासारख्या संकटाने थैमान घातले होते. महापुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले. काही ठिकाणी दरड कोसळून कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा सर्वांना शासनाकडून व समाजातून मदतीचा ओघ सुरूच आहे.

हे संकट लवकरात लवकर टळावे व पूरग्रस्तांचे जीवन सुरळीत व्हावे, यासाठी माहेर संस्थेतील सर्व बालकांनी पूरग्रस्तांसाठी व पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली व या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झालेल्या लोकांना, प्राणिमात्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी प्रत्येकाने पूरग्रस्तांना त्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काही मदत केली पाहिजे, असे सांगितले. पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, या प्रार्थनेसाठी माहेर संस्थेतील सर्व बालके, महिला, पुरुष व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.