शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

माहेर संस्थेतील बालकांची पूरग्रस्तांना जगण्याचे बळ मिळावे, यासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरानजिकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमधील बालकांनी, राज्यातील पूरग्रस्त हतबल न होता ...

रत्नागिरी : शहरानजिकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमधील बालकांनी, राज्यातील पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, यासाठी प्रार्थना केली.

माहेरमध्ये अनेक अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित बालके व निराधार महिला पुरुष दाखल होत असतात. या सर्वांना आपुलकीने सांभाळण्याचे काम माहेर ही संस्था करीत आहे. सामाजिक संवेदनशीलता ही मुलांच्या अंगी बाणवावी, यासाठी विविध सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणात- रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, महाड या ठिकाणी महापुरासारख्या संकटाने थैमान घातले होते. महापुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले. काही ठिकाणी दरड कोसळून कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा सर्वांना शासनाकडून व समाजातून मदतीचा ओघ सुरूच आहे.

हे संकट लवकरात लवकर टळावे व पूरग्रस्तांचे जीवन सुरळीत व्हावे, यासाठी माहेर संस्थेतील सर्व बालकांनी पूरग्रस्तांसाठी व पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली व या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झालेल्या लोकांना, प्राणिमात्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी प्रत्येकाने पूरग्रस्तांना त्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काही मदत केली पाहिजे, असे सांगितले. पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, या प्रार्थनेसाठी माहेर संस्थेतील सर्व बालके, महिला, पुरुष व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.