शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

जिल्ह्यातील २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसाचा सामना करत शहरातील मुख्य चार कोरोना रूग्णालये व परिसरातील वीजपुरवठा रविवारी रात्रीपर्यंत सुरळीत करण्यात आला. सोमवारी सकाळपासून सर्व यंत्रणा कामामध्ये जुंपली होती. जिल्ह्यातील एकूण ३९ कोरोना रूग्णालयांपैकी २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १६ रूग्णालयांतील वीजपुरवठा ठप्प आहे. शिवाय तिन्ही ऑक्सिजन प्लांटमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील एकूण १,२३९ गावांपैकी ७६० गावांमधील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत ४७९ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यास यश आले. अद्याप २८१ गावांमधील वीजपुरवठा बंद आहे. सोमवारी सकाळपासूनच महावितरणची टीम ग्रामीण तसेच शहरी भागात दुरुस्तीसाठी कार्यरत आहे. टप्प्याटप्प्याने नादुरूस्त वाहिनी, ट्रान्स्फार्मर दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.

जिल्ह्यातील एकूण ५५ उपकेंद्रांपैकी २७ उपकेंद्र सुरू असून, २८ उपकेंद्र अद्याप बंद आहेत. त्याचबरोबर ७,५४८ ट्रान्सफार्मरपैकी १,८८३ सुरू असून, ५,६६५ ट्रान्सफार्मर बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण पाच लाख ४५ हजार १२० वीज ग्राहकांपैकी एक लाख ८ हजार ७११ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी अद्याप ३ लाख ५७ हजार ४०९ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असल्याने ग्राहकांना सोमवारीही अंधारात राहावे लागले.

एकूण उच्चदाबाचे १६४ व लघुदाबाचे ३९१ वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. उच्चदाबाची ४९ किलोमीटरची वाहिनी तर लघुदाबाची ११७ किलोमीटरची वाहिनी नादुरूस्त झाली असून, १५ ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाले आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीजवाहिन्या, खांब कोसळले आहेत. ट्रान्सफार्मरही नादुरूस्त झाले आहेत. सागरी किनारपट्टीलगतच्या गावांतून जास्त फटका बसला आहे. त्यामुळे नादुरूस्त भागाचा शोध घेत टप्प्याटप्प्याने एकेक भाग दुरूस्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे ९१० व कंत्राटी ३०४ कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. दुपारनंतर पाऊस कमी झाला असला तरी वारा मात्र कायम होता. तरीही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील होते. कोकण परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत.