शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जिल्ह्यातील २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसाचा सामना करत शहरातील मुख्य चार कोरोना रूग्णालये व परिसरातील वीजपुरवठा रविवारी रात्रीपर्यंत सुरळीत करण्यात आला. सोमवारी सकाळपासून सर्व यंत्रणा कामामध्ये जुंपली होती. जिल्ह्यातील एकूण ३९ कोरोना रूग्णालयांपैकी २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १६ रूग्णालयांतील वीजपुरवठा ठप्प आहे. शिवाय तिन्ही ऑक्सिजन प्लांटमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील एकूण १,२३९ गावांपैकी ७६० गावांमधील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत ४७९ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यास यश आले. अद्याप २८१ गावांमधील वीजपुरवठा बंद आहे. सोमवारी सकाळपासूनच महावितरणची टीम ग्रामीण तसेच शहरी भागात दुरुस्तीसाठी कार्यरत आहे. टप्प्याटप्प्याने नादुरूस्त वाहिनी, ट्रान्स्फार्मर दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.

जिल्ह्यातील एकूण ५५ उपकेंद्रांपैकी २७ उपकेंद्र सुरू असून, २८ उपकेंद्र अद्याप बंद आहेत. त्याचबरोबर ७,५४८ ट्रान्सफार्मरपैकी १,८८३ सुरू असून, ५,६६५ ट्रान्सफार्मर बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण पाच लाख ४५ हजार १२० वीज ग्राहकांपैकी एक लाख ८ हजार ७११ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी अद्याप ३ लाख ५७ हजार ४०९ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असल्याने ग्राहकांना सोमवारीही अंधारात राहावे लागले.

एकूण उच्चदाबाचे १६४ व लघुदाबाचे ३९१ वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. उच्चदाबाची ४९ किलोमीटरची वाहिनी तर लघुदाबाची ११७ किलोमीटरची वाहिनी नादुरूस्त झाली असून, १५ ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाले आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीजवाहिन्या, खांब कोसळले आहेत. ट्रान्सफार्मरही नादुरूस्त झाले आहेत. सागरी किनारपट्टीलगतच्या गावांतून जास्त फटका बसला आहे. त्यामुळे नादुरूस्त भागाचा शोध घेत टप्प्याटप्प्याने एकेक भाग दुरूस्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे ९१० व कंत्राटी ३०४ कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. दुपारनंतर पाऊस कमी झाला असला तरी वारा मात्र कायम होता. तरीही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील होते. कोकण परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत.