शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

चिंचघरीत ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी येथील महिलांवर ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा घेण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीच्या नळ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी येथील महिलांवर ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा घेण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील पंपामध्ये बिघाड झाल्याने गणेवाडी व गुरववाडी या दोन वाड्यांमध्ये गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत.

वारंवार कल्पना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने पंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यातच पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.

चिंचघरी गणेवाडी क्रमांक १ येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पंपहाऊस आहे. बोअरवेलच्या माध्यमातून ही योजना गणेशवाडी क्रमांक १ व गुरववाडीमध्ये राबविण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी या योजनेतील पंप बंद पडला. त्या पंपाची अद्याप दुरुस्ती न झाल्याने गेली बारा दिवस या दोन वाड्यांचा पाणी पुरवठा बंद आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्याची माहितीही दिली. मात्र आज करू, उद्या करू, लॉकडाऊन आहे अशी उडवाउडवीची उत्तरे ग्रामस्थांना मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खरं तर कडक लॉकडाऊन असला तरी कृषी क्षेत्राशी निगडित दुकानांना परवानगी देण्यात आली होती. याशिवाय पंप दुरुस्त करणारा कारागीरही गावातीलच होता, मात्र तरीही पंपाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामपंचायत जाणीवपूर्वक ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या गैरसोयीची तत्काळ दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ राजेंद्र चाळके, प्रफुल्ल चाळके, किशोर चाळके, दीपक गुरव, शैलेश गुरव, प्रीतेश चाळके, राकेश चाळके, नितेश चाळके, शैलेश चाळके, नानू चाळके, संजय गुरव यांनी केली आहे.