शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मिनी मंत्रालयात खातेप्रमुखांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खातेप्रमुखांची पदे रिक्त असून, त्यांचा पदभार प्रभारींकडे आहे. १४ ...

रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खातेप्रमुखांची पदे रिक्त असून, त्यांचा पदभार प्रभारींकडे आहे. १४ पैकी १० खातेप्रमुखच नसल्याने मिनी मंत्रालयाचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अधिकारीच नसल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. जिल्हा परिषदेवर सध्या प्रभारींचे राज्य असल्याचे दिसून येते. अनेक खात्यांना गेले काही महिने खातेप्रमुखच नाही. अधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेचे ग्रहण सुटेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला किमान दोन-तीन खात्यांचा पदभार सांभाळावा लागत आहे.

शिक्षण विभाग तर खिळखिळा झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्याचे दोन वर्षे पद रिक्त असताना त्यांच्याच बरोबरीने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन्ही पदावर गेली तीन-चार वर्षे विस्तार अधिकारीच काम करीत आहेत. त्याचबरोबर गेले सहा महिने ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी हे पदही रिक्त आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींवर अंकुश प्रभारी अधिकाऱ्यांकडून ठेवला जात आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तसेच सहायक लेखा व वित्त अधिकारी ही पदेही रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या आर्थिक भार सांभाळणाऱ्या वित्त विभागाची परिस्थितीही अधिकारी नसल्यासारखीच झाली आहे. हे दोन्ही अधिकारी दोन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्याने आता प्रभारींच्या हाती कारभार आहे. समाजकल्याण विभागात शिक्षण विभागाप्रमाणेच गेली दोन वर्षे खातेप्रमुखच नाही. त्याचा कारभार पशुसंवर्धन विभागाकडून सुमारे वर्षभर चालविला जात होता. महिन्याभरापूर्वी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बदली उस्मानाबादला झाली. त्यामुळे पशुसंवर्धन आणि समाजकल्याण हे दोन्ही विभाग वाऱ्यावरच आहेत.

जिल्हा परिषदेच्या चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतेच नाहीत. या पदावर चिपळूण आणि राजापूर बांधकाम विभागाचे शाखा अभियंते प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था फार बिकट असून वादळांमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अशा स्थितीला या प्रभारींना तोंड द्यावे लागत असून त्यांची दमछाक होत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच साताऱ्याला बदली झाली. जिल्हा परिषदेत रिक्त पदे असताना त्यांनी तत्काळ पद सोडले. त्यामुळे जिल्हा परिषद खिळखिळी झाली आहे.

रिक्त पदे-

शिक्षणाधिकारी- १

उपशिक्षणाधिकारी- २

कार्यकारी अभियंते-२

उप मुख्य कार्यकारी अधिकारी- ३

जिल्हा समाजकल्याण अधिकारी-१

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- १

मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १

सहायक मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १