शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वडिलांच्या नेत्ररूपी अस्तित्वासाठी मरणोत्तर नेत्रदान

By admin | Updated: May 27, 2016 23:12 IST

मरावे परि कीर्तीरूपे उरावे : आंबेशेत येथील सावंत परिवारातील भावंडांनी दिला समाजाला नवा आदर्श

शोभना कांबळे -- रत्नागिरी  मरावे परि कीर्तीरूपे उरावे’, या उक्तीच्याही पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या कीर्तीबरोबरच त्याच समाजात त्यांचे नेत्ररूपी अस्तित्व ठेवण्यासाठी नजिकच्या आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील सावंत परिवारातील भावंडांनी आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा घेतलेला निर्णय अवघ्या समाजासाठी आदर्शवत असाच आहे.आंबेशेत येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद विठ्ठल सावंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना आपल्या नऊ मुलांना अतिशय चांगले शिक्षण दिले. स्वत:ही स्वाभिमानाने जगताना आपली टापटीप रहाणी कायम ठेवली. यासाठी त्यांना बंधू मनोहर सावंत यांचा सदैव हातभार लाभला. आज तीन मुलगे आणि सहा मुली यांचे संसार अतिशय आनंदात सुरू आहेत. सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच कार्यरत असलेल्या गोविंद सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चिटणीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे ज्येष्ठ सल्लागार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई गट) सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केले होते. रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष बी. व्ही. पवार यांचे ते ४० वर्षांपासून स्नेही होते. गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सावंत अर्धांगवायूने ग्रस्त होते. हे दुखणे सोसत असतानाच अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपचारांना त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ते कोमात गेले. डॉक्टरांचे प्रयत्न संपले होते. पत्नी आणि मुलांच्या तर आशाच संपल्या होत्या. मात्र, याही कसोटी लागावी अशा क्षणी, बांधकाम क्षेत्रात असलेले त्यांचे चिरंजीव शरद सावंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्धार केला. तो म्हणजे सामाजिक कार्यात शेवटपर्यंत कार्यरत असलेले आपले वडील शेवटपर्यंत नेत्ररूपाने समाजात राहावे, यासाठी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा. आपले वडील आता काही दिवसांचे नव्हे तर क्षणांचे सोबती असल्याच्या जाणीवेने आईसह सर्व भावंडे आधीच कोलमडून पडलेली होती. त्यामुळे त्यांना हा निर्णय सांगणे धाडसाचे होते. पण त्यांनी ते धाडस दाखविले. आई, भावंडांशी चर्चा केली. त्यांच्या मनावर हे बिंबविताना खूप प्रयत्न करावे लागले व ते फलद्रुप ठरले. सर्वांची संमती मिळाली.अखेर गोविंद सावंत यांचे कोमात असतानाच ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या परिवाराच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले. वडील जाण्याचे दु:ख होतेच, पण त्यांच्या नेत्रांनी समाजातील आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असल्याने समाधानही त्यांच्या कुटुंबियांना होते.