शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

वडिलांच्या नेत्ररूपी अस्तित्वासाठी मरणोत्तर नेत्रदान

By admin | Updated: May 27, 2016 23:12 IST

मरावे परि कीर्तीरूपे उरावे : आंबेशेत येथील सावंत परिवारातील भावंडांनी दिला समाजाला नवा आदर्श

शोभना कांबळे -- रत्नागिरी  मरावे परि कीर्तीरूपे उरावे’, या उक्तीच्याही पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या कीर्तीबरोबरच त्याच समाजात त्यांचे नेत्ररूपी अस्तित्व ठेवण्यासाठी नजिकच्या आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील सावंत परिवारातील भावंडांनी आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा घेतलेला निर्णय अवघ्या समाजासाठी आदर्शवत असाच आहे.आंबेशेत येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद विठ्ठल सावंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना आपल्या नऊ मुलांना अतिशय चांगले शिक्षण दिले. स्वत:ही स्वाभिमानाने जगताना आपली टापटीप रहाणी कायम ठेवली. यासाठी त्यांना बंधू मनोहर सावंत यांचा सदैव हातभार लाभला. आज तीन मुलगे आणि सहा मुली यांचे संसार अतिशय आनंदात सुरू आहेत. सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच कार्यरत असलेल्या गोविंद सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चिटणीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे ज्येष्ठ सल्लागार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई गट) सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केले होते. रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष बी. व्ही. पवार यांचे ते ४० वर्षांपासून स्नेही होते. गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सावंत अर्धांगवायूने ग्रस्त होते. हे दुखणे सोसत असतानाच अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपचारांना त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ते कोमात गेले. डॉक्टरांचे प्रयत्न संपले होते. पत्नी आणि मुलांच्या तर आशाच संपल्या होत्या. मात्र, याही कसोटी लागावी अशा क्षणी, बांधकाम क्षेत्रात असलेले त्यांचे चिरंजीव शरद सावंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्धार केला. तो म्हणजे सामाजिक कार्यात शेवटपर्यंत कार्यरत असलेले आपले वडील शेवटपर्यंत नेत्ररूपाने समाजात राहावे, यासाठी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा. आपले वडील आता काही दिवसांचे नव्हे तर क्षणांचे सोबती असल्याच्या जाणीवेने आईसह सर्व भावंडे आधीच कोलमडून पडलेली होती. त्यामुळे त्यांना हा निर्णय सांगणे धाडसाचे होते. पण त्यांनी ते धाडस दाखविले. आई, भावंडांशी चर्चा केली. त्यांच्या मनावर हे बिंबविताना खूप प्रयत्न करावे लागले व ते फलद्रुप ठरले. सर्वांची संमती मिळाली.अखेर गोविंद सावंत यांचे कोमात असतानाच ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या परिवाराच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले. वडील जाण्याचे दु:ख होतेच, पण त्यांच्या नेत्रांनी समाजातील आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असल्याने समाधानही त्यांच्या कुटुंबियांना होते.