शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या नेत्ररूपी अस्तित्वासाठी मरणोत्तर नेत्रदान

By admin | Updated: May 27, 2016 23:12 IST

मरावे परि कीर्तीरूपे उरावे : आंबेशेत येथील सावंत परिवारातील भावंडांनी दिला समाजाला नवा आदर्श

शोभना कांबळे -- रत्नागिरी  मरावे परि कीर्तीरूपे उरावे’, या उक्तीच्याही पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या कीर्तीबरोबरच त्याच समाजात त्यांचे नेत्ररूपी अस्तित्व ठेवण्यासाठी नजिकच्या आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील सावंत परिवारातील भावंडांनी आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा घेतलेला निर्णय अवघ्या समाजासाठी आदर्शवत असाच आहे.आंबेशेत येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद विठ्ठल सावंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना आपल्या नऊ मुलांना अतिशय चांगले शिक्षण दिले. स्वत:ही स्वाभिमानाने जगताना आपली टापटीप रहाणी कायम ठेवली. यासाठी त्यांना बंधू मनोहर सावंत यांचा सदैव हातभार लाभला. आज तीन मुलगे आणि सहा मुली यांचे संसार अतिशय आनंदात सुरू आहेत. सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच कार्यरत असलेल्या गोविंद सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चिटणीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे ज्येष्ठ सल्लागार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई गट) सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केले होते. रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष बी. व्ही. पवार यांचे ते ४० वर्षांपासून स्नेही होते. गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सावंत अर्धांगवायूने ग्रस्त होते. हे दुखणे सोसत असतानाच अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपचारांना त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ते कोमात गेले. डॉक्टरांचे प्रयत्न संपले होते. पत्नी आणि मुलांच्या तर आशाच संपल्या होत्या. मात्र, याही कसोटी लागावी अशा क्षणी, बांधकाम क्षेत्रात असलेले त्यांचे चिरंजीव शरद सावंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्धार केला. तो म्हणजे सामाजिक कार्यात शेवटपर्यंत कार्यरत असलेले आपले वडील शेवटपर्यंत नेत्ररूपाने समाजात राहावे, यासाठी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा. आपले वडील आता काही दिवसांचे नव्हे तर क्षणांचे सोबती असल्याच्या जाणीवेने आईसह सर्व भावंडे आधीच कोलमडून पडलेली होती. त्यामुळे त्यांना हा निर्णय सांगणे धाडसाचे होते. पण त्यांनी ते धाडस दाखविले. आई, भावंडांशी चर्चा केली. त्यांच्या मनावर हे बिंबविताना खूप प्रयत्न करावे लागले व ते फलद्रुप ठरले. सर्वांची संमती मिळाली.अखेर गोविंद सावंत यांचे कोमात असतानाच ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या परिवाराच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले. वडील जाण्याचे दु:ख होतेच, पण त्यांच्या नेत्रांनी समाजातील आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असल्याने समाधानही त्यांच्या कुटुंबियांना होते.