शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ...

रत्नागिरी : रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन हाेणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

कविकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त व लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, गुरुकुलचे संचालक प्रा. पराग जोशी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित राहणार आहेत.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून एकमेव संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत आकाराला येत आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात आहे. २०,००० चौरस फुटांहून अधिक परिसरात संगणक लॅब, डिजिटल क्लासरूम, यासह योग कक्ष आदी अनेक सोयी या केंद्रात असणार आहेत. लवकरच उपकेंद्राचे स्वतंत्र भवनही साकार होणार आहे.

खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार प्रसाद लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांचीही उपस्थिती कार्यक्रमासाठी लाभणार आहे.

या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नागरिकांनी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.