शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

उमेश सावंतांची खंत : ‘अ‍ॅकॅडमी’ राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणार

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे. क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने आता उचलली आहे. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच तयार होतील, असा विश्वास अ‍ॅड. उमेश सावंत यांनी व्यक्त केला.येथील मुडेश्वर मैदानावर कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम रावराणे, कार्याध्यक्ष शेखर राणे, सचिव नंदकिशोर सावंत, उपाध्यक्ष मधुकर सावंत, मिलिंद बेळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, अनिल हळदिवे, माधुरी गायकवाड, सुभाष सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत म्हणाले, कणकवली शहराला अद्ययावत क्रीडांगणाची आवश्यकता आहे. क्रीडांगणाबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध झाल्यास येथील खेळाडू आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या खेळाची चमक दाखवू शकतील. तसेच इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. त्यासाठी शहरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी एकत्र येत कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीची स्थापना केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अशोक करंबेळकर म्हणाले, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी पालकांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. क्रीडा क्षेत्र विकसीत होण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी नैतिक तसेच आर्थिकदृष्ट्याही क्रीडा संघटनांना पाठबळ दिल्यास निश्चितच चांगले खेळाडू घडू शकतील. या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून लवकरच अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरसेवक सुशांत नाईक, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकिशोर सावंत यांनी प्रास्ताविक करताना अ‍ॅकॅडमीच्या उद्देशांबाबत माहिती दिली. डॉ. तुळशीराम रावराणे यांनी आभार मानले. श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)