शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

उमेश सावंतांची खंत : ‘अ‍ॅकॅडमी’ राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणार

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे. क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने आता उचलली आहे. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच तयार होतील, असा विश्वास अ‍ॅड. उमेश सावंत यांनी व्यक्त केला.येथील मुडेश्वर मैदानावर कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम रावराणे, कार्याध्यक्ष शेखर राणे, सचिव नंदकिशोर सावंत, उपाध्यक्ष मधुकर सावंत, मिलिंद बेळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, अनिल हळदिवे, माधुरी गायकवाड, सुभाष सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत म्हणाले, कणकवली शहराला अद्ययावत क्रीडांगणाची आवश्यकता आहे. क्रीडांगणाबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध झाल्यास येथील खेळाडू आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या खेळाची चमक दाखवू शकतील. तसेच इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. त्यासाठी शहरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी एकत्र येत कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीची स्थापना केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अशोक करंबेळकर म्हणाले, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी पालकांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. क्रीडा क्षेत्र विकसीत होण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी नैतिक तसेच आर्थिकदृष्ट्याही क्रीडा संघटनांना पाठबळ दिल्यास निश्चितच चांगले खेळाडू घडू शकतील. या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून लवकरच अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरसेवक सुशांत नाईक, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकिशोर सावंत यांनी प्रास्ताविक करताना अ‍ॅकॅडमीच्या उद्देशांबाबत माहिती दिली. डॉ. तुळशीराम रावराणे यांनी आभार मानले. श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)