शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस हजार निराधारांना योजनांचा आधार

By admin | Updated: May 24, 2016 00:50 IST

विविध योजना : वर्षभरात २२ कोटी ७८ लाख निधीचे वाटप

रत्नागिरी : निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजनांचा लाभ आता ग्रामीण भागातील जनतेला चांगलाच होऊ लागला आहे. मार्च २0१६ अखेर ३९ हजार ६४६ लाभार्थींना विशेष योजनांचा लाभ मिळाला आहे. या विविध योजनांसाठी गेल्या वर्षभरात २२ कोटी ७८ लाख ४ हजार १२० रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबवण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रुपये इतके अर्थसहाय देण्यात येते.शासनाने या विशेष योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ‘जगणं’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका ग्रामपंचायत स्तरावरही उपलब्ध आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे या सहा योजनांच्या लाभार्थीसंख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना यांना प्रतिसाद कमी आहे. २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ११ कोटी ७८ लाख ८३ हजार ४२०, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ८ कोटी ३३ लाख १६ हजार ४६७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २ कोटी ३९ लाख ९८ हजार ३३३, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २३ लाख ६१ हजार १०० आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २ लाख ४४ हजार ८०० असे एकूण २२ कोटी ७८ लाख ४ हजार १२० रुपयांच्या अनुदानाचे वाटप या सहाही योजनांच्या एकूण ३९,६४६ लाभार्थींना करण्यात आले.या योजनांच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, नवीन सरकार बदलले, त्याबरोबर या समित्याही बरखास्त झाल्या आहेत. मात्र, नवीन समिती अद्याप तयार झाली नसल्याने सध्या तहसीलदारांनाच मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला प्रस्ताव मंजूर होत आहेत. (प्रतिनिधी)