शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

चाळीस हजार निराधारांना योजनांचा आधार

By admin | Updated: May 24, 2016 00:50 IST

विविध योजना : वर्षभरात २२ कोटी ७८ लाख निधीचे वाटप

रत्नागिरी : निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजनांचा लाभ आता ग्रामीण भागातील जनतेला चांगलाच होऊ लागला आहे. मार्च २0१६ अखेर ३९ हजार ६४६ लाभार्थींना विशेष योजनांचा लाभ मिळाला आहे. या विविध योजनांसाठी गेल्या वर्षभरात २२ कोटी ७८ लाख ४ हजार १२० रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबवण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रुपये इतके अर्थसहाय देण्यात येते.शासनाने या विशेष योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ‘जगणं’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका ग्रामपंचायत स्तरावरही उपलब्ध आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे या सहा योजनांच्या लाभार्थीसंख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना यांना प्रतिसाद कमी आहे. २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ११ कोटी ७८ लाख ८३ हजार ४२०, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ८ कोटी ३३ लाख १६ हजार ४६७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २ कोटी ३९ लाख ९८ हजार ३३३, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २३ लाख ६१ हजार १०० आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेंतर्गत २ लाख ४४ हजार ८०० असे एकूण २२ कोटी ७८ लाख ४ हजार १२० रुपयांच्या अनुदानाचे वाटप या सहाही योजनांच्या एकूण ३९,६४६ लाभार्थींना करण्यात आले.या योजनांच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, नवीन सरकार बदलले, त्याबरोबर या समित्याही बरखास्त झाल्या आहेत. मात्र, नवीन समिती अद्याप तयार झाली नसल्याने सध्या तहसीलदारांनाच मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला प्रस्ताव मंजूर होत आहेत. (प्रतिनिधी)