शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

खते, बियाणे शेताच्या बांधावर देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : खते तसेच बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून ...

रत्नागिरी : खते तसेच बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत असल्याची माहिती रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या वर्षी ६४ - ६५ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावेळी ती किमान एक लाख हेक्टरपर्यंत करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी जी पडिक शेतजमीन होती, त्यामध्ये भात लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी भाताची नवीन बियाणी संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जी रासायनिक खते, सेंद्रिय खते आहेत, ती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून नियोजन करत आहोत, असे ते म्हणाले.

यावर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भात उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून हमीभाव भात खरेदीची योजना सुरू आहे. यावर्षी साधारणतः २५०० ते २६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला, पुढच्या वर्षी तो वाढावा, यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरवाढ झालेल्या खतांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील भाजपकडून केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.